शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

ग्रामगीता प्रत्येक गावाची मार्गदर्शक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:20 IST

ज्या मातीमध्ये आदर्श गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहिला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी त्यांनी सक्षक्त गाव व देशभक्तीचा नारा बुलंद केला. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा आदर्श ग्रामगिता असली पाहिजे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : जिल्ह्यातील आदर्श ग्राम सेवकांचा सत्कार सोहळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ज्या मातीमध्ये आदर्श गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहिला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी त्यांनी सक्षक्त गाव व देशभक्तीचा नारा बुलंद केला. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा आदर्श ग्रामगिता असली पाहिजे. त्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या ग्रामसेवकांचा सत्कार आज करता आला, याचा आनंद असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्राम पुरस्कार वितरण सोहळा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळा व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांची कार्यशाळा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उदघाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, गुरुदेव सेवाश्रम पाठसूळ अकोला येथील राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ.उध्दव गाडेकर महाराज, औरगांबाद जिल्हयातील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर थेरे पाटील, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रिजभूषण पाझारे, अर्जना जीवतोडे, गोदावरी केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, रवींद्र मोहिते, ओमप्रकाश यादव आदींची उपस्थिती होती. दुसºया सत्रामध्ये बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा आदर्श ठेवत काम करण्याचे सांगितले. गावामध्ये सुखसुविधा आणि जीवनावश्यक मुलभूत सुविधा असणे म्हणजे गाव जिवंत असणे होय. आता गावे वाचविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावासंदर्भात निर्णय घेताना गतीशिलपणे योजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. केवळ ग्रामसेवक नव्हे तर सरपंच, सदस्य व नागरिकांचा सहभाग ग्रामविकासात आवश्यक आहे. सर्वांची साथ मिळते तेव्हा आदर्श गाव घडते. महिला आरक्षणामुळे ५० टक्के महिला सद्या कार्यरत आहेत. त्या उत्तम प्रकारे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी आदर्श ग्राम पुरस्कार देऊन मूल तालुक्यातील बाबराळा या गावाला सन्मानित करण्यात आले. तर ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी गावाला द्वितीय तर वरोरा तालुक्यातील वंधली या गावाला दोन लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार दिला.यावेळी ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी’ या विषयावर झालेल्या निबंध स्पर्धेचाही पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये चंद्रपूर येथील दादाजी रामचंद्र मोरे, कोरपना तालुक्यातील भुवीगुडा गावाचे विशाल नारायण बोथाडे व्दितीय तर प्रवीण पंढरीनाथ पिसे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.१८ वर्षाखालील स्पर्धेसाठी इशिता प्रदिप धकाते प्रथम, आशिष राहुल नागदेवते द्वितीय, समिक्षा शंकर बावणे तृतीय यांनाही पुरस्कार देण्यात आले. जिल्हास्तरीय लघुपट स्पर्धा बक्षिस वितरण सोहळाही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.कर्मचाऱ्यांनी योजनांची अंमलबजावणी करावी- अहीरयावेळी सकाळच्या सत्रात ना.हंसराज अहीर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेकडो योजना ग्राम विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन ग्राम विकास साध्य करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाºया कर्मचाºयांनी ग्राम विकासाच्या प्रयोगाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.या ग्रामसेवकांचा सन्मानचंद्रपूर पंचायत समितीमधील ग्रामसेवक निलेश डवरे, चिमूर येथील किशोर ढपकस, बल्लारपूरमधील प्रताप ढुमणे, मूल येथील किशोर ठेंगणे, सावलीमधील संदीप सबनवार, नागभीडमधील अजय राऊत, ब्रम्हपुरी येथील प्रवीण तावेडे, भद्रावतीमधील रजनी खामनकर, वरोरा येथील सुशिल शिंदे, सिंदेवाही येथील दिवाकर येरमलवार, राजुरा येथील वर्षा भोयर, गोंडपिपरी येथील आशिष आकनूरवार, कोरपनामधील नितीन नरड, पोंभूर्णामधील प्रकाश रामटेके व जिवती येथील पुंडलिक ठावरे या ग्रामसेवकांचा सत्कार केला.