शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

ग्रामपंचायतीप्रमाणेच अन्य विभागांनाही वृक्षलागवड संगोपनासाठी तरतूद हवी

By admin | Updated: July 2, 2016 01:13 IST

वृक्षारोपणाचे धडक कार्यक्रम १ जुलै रोजी पार पडले. मात्र ग्रामपंचायती सोडून अन्य कोणत्याही विभागास संगोपनाची तरतुद नसल्याने लावलेली झाडे जगवायची कशी,

नागभीड : वृक्षारोपणाचे धडक कार्यक्रम १ जुलै रोजी पार पडले. मात्र ग्रामपंचायती सोडून अन्य कोणत्याही विभागास संगोपनाची तरतुद नसल्याने लावलेली झाडे जगवायची कशी, असा प्रश्न अन्य विभाग करीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व्यतीरिक्त इतर विभागांनाही आर्थिक तरतूद करून देण्याची मागणी होत आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाच्या ऱ्हास होत आहे. हा ऱ्हास भरुन काढण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षापासून वृक्षारोपणाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे वृक्षारोपण होत असले तरी अनेक ठिकाणी वृक्षारोपण केवळ कागदावरच आहे. अनेक ठिकाणी तर वृक्षारोपण करायचे म्हणून करीत आहेत. गांभीर्य कुठेच दिसत नाही.या पार्श्वभूमीवर यावर्षी महाराष्ट्र शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात उद्दीष्ट देण्यात आले आहे. संस्था, स्वयंसेवी संस्था यांनाही सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र हे उद्दिष्ट आणि सहभाग केवळ वृक्षारोपण करुन घेण्यापुरताच आहे. ग्रामपंचायती वगळता अन्य कोणत्याही विभागास वृक्षारोपण केल्यानंतर त्या रोपट्याचे संगोपण करण्यासठी तरतुद नसल्याने अन्य विभागात थोडी उदासिनताच दिसून येत आहे. अन्य शासकीय विभागाप्रमाणेच वृक्षारोपणाच्या या धडक कार्यक्रमात ग्रामपंचायतींनाही सामावून घेण्यात आले आहे. मात्र या ग्रामपंचायती रोजगार हमी योजनेतून वृक्षारोपण करीत असल्याचे वृत्त आहे. मग्रारोहयो मधून वृक्षारोपण होत असल्याने लावण्यात आलेल्या झाडांवर खर्च करण्याचे प्रावधान असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर एका झाडावर २१०० रुपये खर्च करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. अशीच तरतुद अन्य विभागांसाठी का करण्यात येवू नये, असा सवाल अन्य विभाग करीत आहते. (तालुका प्रतिनिधी)