शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

जिल्ह्याला भिजलेल्या धान्याचा पुरवठा

By admin | Updated: October 1, 2015 01:18 IST

अन्न सुरक्षा योजना व इतर योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्य वितरीत केले जाते.

माल उचलण्यास प्रशासनाचा नकार : धान्यासाठी करावी लागणार प्रतीक्षाचंद्रपूर : अन्न सुरक्षा योजना व इतर योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्य वितरीत केले जाते. यासाठी आॅक्टोबर महिन्याचे शेकडो क्विंटल धान्य जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाले आहे. मात्र हे धान्य पावसाने भिजले असून अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे धान्य उचलण्यास नकार दिल्याची माहिती हाती आली आहे. निकृष्ठ दर्जाचे धान्य गरिबांना वितरीत करून आक्रोश ओढवून घेण्यापेक्षा चांगल्या दर्जाचे धान्य पुरवठा करा, तेव्हाच धान्याची उचल केली जाईल, असा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे धान्य मिळण्याला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता असून गरिबांना धान्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची पाळी आली आहे. राज्य शासन दर महिन्याला जिल्हा प्रशासनाच्या मागणीप्रमाणे धान्याचे नियतन मंजूर करत असते. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार आॅक्टोबर महिन्याचे धान्य नियतन मंजूर करून जिल्हा प्रशासनाला धान्य पुरवठा करण्यात आले. पुरवठा करण्यात आलेले धान्य हे पंजाब राज्यातून आलेला असून सर्व धान्य पावसात भिजलेला आहे. दहा ते पंधरा दिवसांपुर्वी राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसात हे धान्य भिजून खराब झाले आहे. धान्याची खराब वास येत असल्याने जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धान्याची चौकशी करून माल उचलण्यास स्पष्ठ नकार दिल्याची माहिती आहे. पुरवठा करण्यात आलेले धान्य वखार महामंडळाच्या गोदामात असून हे धान्य शासनाला परत पाठवून चांगल्या दर्जाचे धान्य पुरवठा करा, तरच धान्याची उचल करून शिधापत्रिकाधारकांना वितरीत केला जाईल, असा दम वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)