शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्य दुकानातील धान्याची बेभाव विक्री

By admin | Updated: March 19, 2016 00:46 IST

शासनाच्या वतीने दर निश्चित करून पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा धान्य वितरणाकदूता रास्त भाव दुकानांमार्फत धान्य वाटप करण्याचे निर्धारित आहे.

नियमांची पायमल्ली : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षगेवरा : शासनाच्या वतीने दर निश्चित करून पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा धान्य वितरणाकदूता रास्त भाव दुकानांमार्फत धान्य वाटप करण्याचे निर्धारित आहे. परंतु सदर धान्याची ग्रामीण खेड्यात नियमांची पायमल्ली करून बेभाव विक्री सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याची बोंब शिधापत्रिकाधारक करीत आहेत.पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून तहसीलदारांमार्फत गटविकास अधिकाऱ्यांना प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शासकीय दरपत्रक परिपत्रकासह प्रसिद्धीसाठी पाठविल्या जाते व प्रत्येक गावातील गावकऱ्यांना योजनानिहाय धान्य पुरवठ्याच्या तपशिलाचे परिपत्रक प्रसिद्धीस द्यायचा असते, असे शासकीय संकेत आहेत. त्यामध्ये अंतोदय अन्न योजनेच्या लाभधारकास प्रतिकार्ड ३५ किलो धान्य, २० किलो गहू २ रुपये दराने तर १५ किलो तांदुळ ३ रु. दराने व साखर प्रति किलो १३ रुपये ५० पैसे या दराने उपलब्ध होते. तर दारिद्रय रेषेखालील कुटुंब लाभार्थींना प्रति व्यक्ती ३ किलो गहू २ रु. प्रमाणे तांदुळ प्रति व्यक्ती २ किलो ३ रुपये प्रमाणे, साखर प्रति व्यक्ती ४०० ग्रॅम या नुसार प्रतिकिलो १३.५० पैसे विक्री करायची आहे. परंतु ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानातून या दरपत्रकास तिलांजली देवून साखर सरळसरळ २० रुपये प्रति किलोप्रमाणे विकली जाते तर गहू व तांदूळ धान्य दुकानदारांच्या मर्जीनुसार विक्री होत असते.शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक धान्य दुकानात दरपत्रकाचे फलक दुकानाच्या दर्शनी भागावर लावायचे असते. प्राप्त व उचल केलेला माल, उपलब्ध साठा, प्रमाण प्रकार, दर्शविणारा सुचना फलक असावा लागतो. प्रत्येक कार्डधारकांना पावती द्यावी लागते. इलेक्ट्रॉनिक्स काट्याचे वजन आदी बाबीची पुर्तता स्वस्त धान्य दुकानातुन करायची असते.परंतु या बाबीकडे दुर्लक्ष होत असून तालुका प्रशासनाकडे सदर धान्य दुकानदारांमार्फत कोणते विवरण पत्र सादर केले जाते, याची अनभिज्ञता आहे. ज्यामुळे ग्रामीण भागात स्वस्त धान्य व्यवस्था सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनास वाटते. शिधापत्रिका धारक ग्राहकांनी एका गावात बेभाव विक्री व वरिल सर्व अनियमितता बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. तेव्हा या बाबी चौकशीत स्पष्ट झाल्या. याची जिल्हा प्रशासनाला खात्री पटून संबंधित धान्य दुकानावर परवाना रद्द व फौजदारी दाखल करण्याचे आदेश तहसीलदार सावली यांच्या अहवालावरून दिले. परंतु जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सदर धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली व बाजू ऐकुण संबंधित दुकानदारास दंड म्हणजे १००० रुपये आकारून सरळ मोकळे केले असल्याने तक्रारकर्त्या ग्रामस्थांना न्यायापासून वंचित रहावे लागले आहे.वाढत्या महागाईच्या तुलनेत स्वस्त धान्य दुकानातील धान्य नगण्य भावात उपलब्ध होत असल्याने याचे महत्व सर्वसामान्यांना आहे. मात्र तसे ेहोत नसून फायदा मात्र विक्रेत्यांनाच होताना दिसतो. याची बोंब गावागावात होवू लागली. परंतु गावातील नागरिकांची ओरड ी गावपातळीच्या पुढे आली नाही. सामान्य नागरिक आहे त्या स्थितीत सर्व चालवितात. त्यामुळे प्रशासनाला या बाबीची गंभीरता कळू शकत नसावी, असे दिसून येते. (वार्ताहर)