शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया डगमगला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 21:23 IST

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत चाचणी घेण्यात घेण्यात आली. यामध्ये तीनही विषयांचे पाच स्तर तयार करण्यात आले. या स्तरानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची काही दिवसापूर्वी अध्ययन स्तर चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये धक्कादायक सत्य समोर आले आहे. चाचणीमध्ये पहिल्या वर्गातील सोडाच पाचवीच्याही अनेक विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे सत्य समाेर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ही चाचणी शिक्षण विभागाने घेतली असून, त्याचा निकालही जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती कुठपर्यंत आहे, याचा अभ्यास करण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत चाचणी घेण्यात घेण्यात आली. यामध्ये तीनही विषयांचे पाच स्तर तयार करण्यात आले. या स्तरानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. मात्र, यामध्ये ठरवून दिलेल्या मूल्यमापनापेक्षाही कितीतरी कमी पटीने विद्यार्थी गुणवत्तेत मागे असल्याचे निकालातून दिसून येत  आहे.  पहिली आणि दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना विचार केला नाही तरी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्गातील  विद्यार्थ्यांना किमान शब्द ओळख, वाचन, लिखान येणे गरजेचे आहे. 

मातृभाषेमध्येही विद्यार्थी मागेघेण्यात आलेल्या चाचणीमध्ये मातृभाषा असलेल्या मराठीमध्येही विद्यार्थी मागे असल्याचे दिसून येते. यामध्ये ११.८ टक्के विद्यार्थ्यांना साध्या अक्षरांची ओळख नाही, तर २२.८ टक्के विद्यार्थ्यांना गोष्ट वाचता येते.२१.९ टक्के विद्यार्थी केवळ शब्दच वाचन करू शकतात तर २२.२ टक्के विद्यार्थ्यांना अक्षराची ओळख आहे.

शिक्षकांमध्ये नाराजीगुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, अनेकवेळा ते चुकीच्या पद्धतीने कार्यक्रम आखले जात असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. ही चाचणीही घेताना पहिला आणि दुसरा वर्ग वगळून घेणे अपेक्षित होते.  जुलै महिन्यामध्ये शाळा सुरू झाली असताना सप्टेंबरमध्येच चाचणी घेण्याची घाई प्रशासनाने केली. त्यामुळे गुणवत्ता ढासळल्याचे काही गुरुजींचे म्हणणे आहे

इंग्रजीची भीती मात्र कायमचपहिली ते पाचवीपर्यंत घेण्यात आलेल्या अध्ययन स्तर चाचणीमध्ये  विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती असल्याचे दिसून येते. चाचणी घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७५.५६ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दाचा अर्थ, तर ९३.६४ टक्के विद्यार्थ्यांना वाक्याचा अर्थ सांगता येत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. केवळ ६.४ टक्केच विद्यार्थ्यांना वाक्याचे वाचन करता येते. १३.७ टक्के विद्यार्थी प्रारंभिक स्तरावरच असल्याचे दिसून येते.

 भाषा विषयात १५ शाळांची प्रगती समाधानकारक   - जिल्ह्यातील एकूण शाळांमध्ये घेतलेल्या चाचणीमध्ये केवळ १५ शाळांची प्रगती काहीशी समानधाकारक आहे. यामध्ये मराठी भाषेतील गोष्ट वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र, या १५ शाळांमधील पटसंख्या ही अगदीच कमी आहे. या शाळामध्ये भद्रावतीतील बेलोरा, अगारा, किलोनी, कढोली, गुंजाळा, मोरवा, ब्रह्मपुरी तालुक्यातील गवराळा, पवनपार, कुडेसावली, जिवती तालुक्यातील चिखली बु., मूल तालुक्यातील ताडाळा, चांदापूर (हेटी), पोंभूर्णा तालुक्यातील डोंगळहळदी तु., सातारा भोसले, राजुरा तालुक्यातील हिरापूर या शाळांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा