शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

गोविंदाच्या गजरात निघणार रातघोडा

By admin | Updated: February 9, 2017 00:40 IST

पावणे चारशे वर्षांचा इतिहास असलेली चिमूर येथील घोडारथ यात्रा जिल्ह्यात नाही तर विदर्भात प्रसिद्ध आहे.

घोडा रथयात्रा उत्सवाला सुरुवात : लाखो भाविक होणार सहभागी, सोमनाथ मंदिर ठरतेय आकर्षणराजकुमार चुनारकर चिमूरपावणे चारशे वर्षांचा इतिहास असलेली चिमूर येथील घोडारथ यात्रा जिल्ह्यात नाही तर विदर्भात प्रसिद्ध आहे. मितीमाघ शुद्ध (वसंत पंचमी) १ फेब्रुवारीला सुरु झालेल्या घोडारथ यात्रेचा रातघोडा प्रसिद्ध आहे. या रात घोड्यासाठी पंचक्राशीतील लाखो भाविक बालाजी महाराजांचे दर्शन घेवून मोठ्या उत्सवाने सहभागी होतात. बुधवारी रात्री १० वाजता ‘गोविंदा... गोविंदा’च्या गजरात शहराच्या मुख्य मार्गाने रात घोड्याची मिरवणूक निघणार आहे.१ फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या या घोडायात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. दररोज रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत विनोदुबवा खोड महाराज उमरेड यांचे कीर्तन होत आहे. चिमूरचा घोडा, ब्रह्मपुरीचा जोडा आणि चंद्रपूर वढा या पुरातन म्हणीनुसार ३९० वर्षापासून सुरु असलेल्या चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज घोडारथयात्रा वसंत पंचमीला सुरु झाली.घोडारथ यात्रेमधील भाविकाच्या मनोरंजनासाठी आकाशपाळणे, सर्कस, खेळण्याची दुकाने इतर साहित्याचे दुकान थाटले आहेत. गाव खेड्यातून येणाऱ्या भाविकांना निरनिराळे मनोरंजनाचे केंद्र थाटले आहेत. मितीमाघ शुद्ध जयोदशी गुरुवारी रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत अशा लाकडी घोडारथावरुन श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेची घोडारथ यात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत मंदिरासमोर स्थापना होते. या रात्र घोड्यासाठी विदर्भातील व पंचक्रोशीतील जवळपास एक ते दीड लाख भाविक रथयात्रेत हजेरी लावून भक्तीमय वातावरणात गोविंदा ... गोविंदा च्या गजरात भक्त तल्लीन होतात. शनिवारी ११ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत गोपालकाला होवून नवरात्री समाप्ती होणार आहे. ३९० वर्षापासून सरु असलेली घोडारथ यात्रा मोठ्या भक्तीभावाने आजच्या डिजिटल युगातही सुरू आहे.सोमनाथ मंदिर ठरतेय भाविकाचे आकर्षणभाविकांना देशातील इतर मंदिराची माहिती व्हावी म्हणून आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्या वतीने नऊ वर्षापासून मंदिराच्या पुढे प्रतिकृती तयार करण्यात येते. सध्या येथे तयार झालेले गुजरात येथील सोमनाथ मंदिर भाविकांचे आकर्षण ठरत आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तविदर्भात प्रसिद्ध असलेला घोडारथ यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या शांतता सुव्यवस्थेसाठी चिमूर पोलीस विभागातर्फे १२ अधिकारी, शंभर कर्मचारी,एसआरपी पथक यासह सिव्हील वेशातील गोपनीय कर्मचारची नियुक्ती केली आहे. रातघोडा व काल्याचा दिवसापासून शहरातील मुख्य मार्गाने जड वाहनाना प्रवेश दिल्या जाणार नाही.- दिनेश लबडे, ठाणेदार, चिमूरघोडा रथयात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी नियोजित यात्रा मैदानावरील जागेचे सपाटीकरण, यात्रेकरुसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्यपथकाची व्यवस्था, अग्निशामन व्यवस्था, विद्युत व्यवस्था व शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिस पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे.- शिल्पा राचलवार, नगराध्यक्ष