शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

राज्यपालांनी केले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

By admin | Updated: December 13, 2014 22:36 IST

जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने चंद्रपूर शहरात लोकसहभागातून बसविण्यात आलेल्या आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी

चंद्रपूर : जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने चंद्रपूर शहरात लोकसहभागातून बसविण्यात आलेल्या आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, राज्यपालांचे सचिव विकास रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, कुलगुरु डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव व वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यावेळी उपस्थित होते.चंद्रपूर शहरातील वाहतूक व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या २० चौकात लोकसहभागातून ८४ सिसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यासर्व कॅमेऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शाखा आधुनिक नियंत्रण यंत्रणा उभारण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नियंत्रित करण्यात येत असलेल्या वाहतुकीबाबतचे सादरीकरण केले. शहरातील गजबलेल्या सर्व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच गुन्हेगारीला आळा बसला असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण ३५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच लोकसहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. या यंत्रणेमुळे छोट्या मोठ्या गुन्हेगारी घटनांची माहिती तात्काळ कंट्रोल रुमला होते. यावेळी काही घटनांचे चित्रीकरण कॅमेऱ्याबद्ध झाल्याचे जैन यांनी सादरीकरणातून दाखविले. यासर्व सादरीकरणाचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी कौतुक केले. संचालन मेघनाथ जानी यांनी केले. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी, सामाजिक संस्था व अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)