शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

शासनाच्या आदेशाने खाजगी शाळांत धास्ती

By admin | Updated: June 3, 2017 00:33 IST

राज्यातील सर्व अनुदानित व अनुदान पात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीद्वारे घेण्याचा निर्णय नुकताच शिक्षण विभागाने घेतला आहे.

शाळा व्यवस्थापक नाराज : उमेदवारांत मात्र आनंदलोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर (तळोधी) : राज्यातील सर्व अनुदानित व अनुदान पात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीद्वारे घेण्याचा निर्णय नुकताच शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील खाजगी शाळा व्यवस्थापक मंडळीचे धाबे दणाणले आहेत. तर अनुदानित व अनुदान पात्र शाळातील कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यासंदर्भात नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांची भेट घेतली असता, त्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्तीमधील भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी कर्मचारी नियुक्तीचे आदेश खासगी व्यवस्थापकांकडून काढून घेवून ते स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावे, या मागणीकरीता २०१० पासून सातत्याने प्रयत्नात असल्याची माहिती दिली. याकरिता शिक्षक आमदार म्हणून निवेदन देणे, तारांकीत व अतारांकीत प्रश्न लावणे, लक्षवेधी शिवाय शासकीय व अशासकीय अशा सर्व आयुधाचा वापर करण्यात आले व शेवटी शासनाने हा निर्णय जाहीर केला. राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील सर्व अनुदानित व अनुदान पात्र शाळांत आॅनलाईन शिक्षक भरतीची केंद्रीय परीक्षा घेवून गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांत अधिक गुणवत्तापूर्वक शिक्षक उपलब्ध होऊ शकतील.तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपुष्टात आणणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.नागो गाणार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक पदाकरिता शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार आॅनलाईन केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीद्वारे होणारी परीक्षा पाचवेळा देवू शकेल व जो उमेदवार पाच प्रयत्नात ही परीक्षा पास होईल, तोच शिक्षक पदाकरीता पात्र ठरेल. याच प्रयत्नात पास न होणारा उमेदवार पुन्हा या परीक्षेला बसू शकणार नाही. या शिक्षक पात्रता परीक्षेकरिता आवश्यक अभ्यासक्रम शासनाकडून तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाकडून जाहीर केलेल्या या निर्णयामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा काही प्रमाणात गदा येणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील बराचसा भ्रष्टाचार कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे खाजगी शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थापक मंडळी कोर्टात जावून स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न करतील, अशी भितीही शिक्षक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.शिक्षण क्षेत्रातील शिक्षक नियुक्तीचे अधिकार काढून घेण्यात यावे अशी सातत्याने मागणी आ. नागो गाणार यांनी केली होती. त्यांच्या काळात कर्मचाऱ्यांना आॅनलाईन वेतन मिळावे व शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी नियुक्तीचे आदेश शाळा व्यवस्थापक मंडळाकडून काढण्यात यावे या दोन महत्वपूर्ण मागणीला महाराष्ट्र शासनाने पाठिंबा देवून निर्णय घेतल्याचे त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अनेकांत आनंद पसरले आहे.