शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

सर्वेक्षण करणारी सरकारी यंत्रणा शेतात पोहोचलीच नाही

By admin | Updated: September 30, 2015 01:40 IST

१६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे जिवती तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके

जिवती: १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे जिवती तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके आडवी झाली. यामुळे हाती येणाऱ्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत असले तरी आठवडाभरानंतरही पिकाचे सर्वेक्षण करणारी यंत्रणाच शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नसल्याने पहाडावरील शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना छळत आहे.तालुक्यात एक लाख ४६ हजार ६३८ हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात कापूस १० हजार ९१० हेक्टर, तुर एक हजार १२० हेक्टर, ज्वारी एक हजार ७७५ हेक्टर, तर ५६२ हेक्टरवर सोयाबिनची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाने पहाडावरील शिवार फुलले होते. समाधानकारक पिके पाहून शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र १६, आणि १७ सप्टेंबरला झ्ोालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात हिरवीगार दिसणारी पिके काही क्षणातच आडवी झाली. काही झाडे तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले. वर्षभर शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या प्रकोपामुळे तोंडचा घास हिरावला गेल्याचे चित्र असतानाही संबंधित विभागाने शेतीचे सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही दाखविले नाही. अतिवृष्टीनंतर तर तहसीलदारांनी पिकाचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पटवारी यांना केल्या होत्या. मात्र सर्वेक्षण झाले नाही.(तालुका प्रतिनिधी)दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील हिरवीगार पिके क्षणात आडवी पडली. हाती येणाऱ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्याचे सर्वेक्षण तर झालेच नाही; पण आता परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने आहे ते पिकही करपत आहे. त्यातच कापसावर लाल्या रोगाचा प्रभावही दिसत आहे. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांवर अशी संकट येत असताना उत्पन्न कमी व खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.