शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षण करणारी सरकारी यंत्रणा शेतात पोहोचलीच नाही

By admin | Updated: September 30, 2015 01:40 IST

१६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे जिवती तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके

जिवती: १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे जिवती तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके आडवी झाली. यामुळे हाती येणाऱ्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत असले तरी आठवडाभरानंतरही पिकाचे सर्वेक्षण करणारी यंत्रणाच शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नसल्याने पहाडावरील शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना छळत आहे.तालुक्यात एक लाख ४६ हजार ६३८ हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात कापूस १० हजार ९१० हेक्टर, तुर एक हजार १२० हेक्टर, ज्वारी एक हजार ७७५ हेक्टर, तर ५६२ हेक्टरवर सोयाबिनची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाने पहाडावरील शिवार फुलले होते. समाधानकारक पिके पाहून शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र १६, आणि १७ सप्टेंबरला झ्ोालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात हिरवीगार दिसणारी पिके काही क्षणातच आडवी झाली. काही झाडे तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले. वर्षभर शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या प्रकोपामुळे तोंडचा घास हिरावला गेल्याचे चित्र असतानाही संबंधित विभागाने शेतीचे सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही दाखविले नाही. अतिवृष्टीनंतर तर तहसीलदारांनी पिकाचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पटवारी यांना केल्या होत्या. मात्र सर्वेक्षण झाले नाही.(तालुका प्रतिनिधी)दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील हिरवीगार पिके क्षणात आडवी पडली. हाती येणाऱ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्याचे सर्वेक्षण तर झालेच नाही; पण आता परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने आहे ते पिकही करपत आहे. त्यातच कापसावर लाल्या रोगाचा प्रभावही दिसत आहे. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांवर अशी संकट येत असताना उत्पन्न कमी व खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.