शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

सर्वेक्षण करणारी सरकारी यंत्रणा शेतात पोहोचलीच नाही

By admin | Updated: September 30, 2015 01:40 IST

१६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे जिवती तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके

जिवती: १६ आणि १७ सप्टेंबर असे दोन दिवस कोसळलेल्या अतिवृष्टी व वादळामुळे जिवती तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके आडवी झाली. यामुळे हाती येणाऱ्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत असले तरी आठवडाभरानंतरही पिकाचे सर्वेक्षण करणारी यंत्रणाच शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नसल्याने पहाडावरील शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना छळत आहे.तालुक्यात एक लाख ४६ हजार ६३८ हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात कापूस १० हजार ९१० हेक्टर, तुर एक हजार १२० हेक्टर, ज्वारी एक हजार ७७५ हेक्टर, तर ५६२ हेक्टरवर सोयाबिनची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाने पहाडावरील शिवार फुलले होते. समाधानकारक पिके पाहून शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र १६, आणि १७ सप्टेंबरला झ्ोालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात हिरवीगार दिसणारी पिके काही क्षणातच आडवी झाली. काही झाडे तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले. वर्षभर शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या प्रकोपामुळे तोंडचा घास हिरावला गेल्याचे चित्र असतानाही संबंधित विभागाने शेतीचे सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही दाखविले नाही. अतिवृष्टीनंतर तर तहसीलदारांनी पिकाचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, पटवारी यांना केल्या होत्या. मात्र सर्वेक्षण झाले नाही.(तालुका प्रतिनिधी)दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील हिरवीगार पिके क्षणात आडवी पडली. हाती येणाऱ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्याचे सर्वेक्षण तर झालेच नाही; पण आता परिसरात उन्हाची तीव्रता वाढल्याने आहे ते पिकही करपत आहे. त्यातच कापसावर लाल्या रोगाचा प्रभावही दिसत आहे. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांवर अशी संकट येत असताना उत्पन्न कमी व खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.