शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: September 24, 2014 23:27 IST

सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गावागावांतील अस्वच्छतेमुळे सर्वत्र डेंग्यूसदृश तापाचे थैमान पसरले आहे. आजारी रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालये हाऊसफूल आहे.

राजुरा : सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गावागावांतील अस्वच्छतेमुळे सर्वत्र डेंग्यूसदृश तापाचे थैमान पसरले आहे. आजारी रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालये हाऊसफूल आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशा स्थितीत सामान्य नागरिक विविध समस्या व अडचणीत सापडले आहे.सध्या मध्येच थोडाफार पाऊस पडतो आणि काही क्षणासाठी वातावरण थंड करुन जातो. त्यानंतर बेपत्ता होवून सूर्य आग ओकतो, त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढून सर्वत्र आजाराची साथ सुरु आहे. प्रत्येक गाव आजारात सापडले आहे. घरोघरी रुग्ण तडफडत आहे. सरकारी रुग्णालय फूल आहे. तसेच खाजगी दवाखाने सुद्धा हाऊस फूल झाले आहे. त्यामुळे सध्या तरी शासनाची आरोग्य सेवा कोलमडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ मलेरियाची टेस्ट केली जाते. परंतु रिपोर्ट दिला जात नाही. निगेटीव्ह आहे असे सांगितले जाते. डेंग्युची तपासणी होत नसल्यामुळे डेंग्यु सदृश्य ताप असलेल्या रुग्णांवर मलेरियाचे उपचार केले जात आहे. या प्रकारामुळे रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यावर ‘रेफर टू चंद्रपूर’ केले जाते. बऱ्याच वेळेस काही वैद्यकीय अधिकारी रेफर करुन घरी आराम करतात. त्यांच्या रेफर प्रकारामुळे खाजगी व बोगस डॉक्टराचे फावत आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी दवाखाना उघडून रुग्णावर औषोधोपचार सुरु केले आहे. घरोघरी जावून उपचार करीत आहे. त्यांना रक्त तपासणीची गरज नाही. सखोल ज्ञान असल्याप्रमाणे रुग्णास पाहून थातूरमातूर उपचार करतात. रुग्ण बरा झाला की, विश्वास बसतो. आणि कमी खर्चात योग्य उपचार म्हणून त्यांची ख्याती होते. परंतु रुग्ण बरा झाला नाही तर त्याच्या बांधलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. तेथे मात्र मागचे पुढेचे सर्व वसुल केले जाते. रुग्णांचा रक्त तपासणी हा एक पॅथॉलाजीचा मोठा व्यवसाय झाला आहे. शासकीय रुग्णालयातील पॅथॉलाजीच्या रिपोर्टवर रुग्णांचा विश्वास नाही. खासगी डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी आपल्या मर्जीच्या पॅथालाजी निवडल्या आहे. तेथे रुग्णास पाठविले जाते. त्यामध्ये दोघांचेही हित साधले असते. रुग्ण बरा झाल्यावर बिल पाहून नातेवाईकाचे ब्लडप्रेशर वाढत आहे. सध्या निसर्गाच्या प्रकोपामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून विविध आजाराची साथ वाढली आहे. यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)