शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

महाराजस्व अभियानामार्फत शासन जनतेच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:16 IST

राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात.

ठळक मुद्देसंजय धोटे : देवाड्यात महाराजस्व अभियान योजनेला सुरुवात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शासनाचा मुळ उद्देश सार्थ होत नाही. त्यामुळे शासनाने आता प्रशासनाच जनतेच्या दारात नेण्याचा व ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराजस्व अभियानामार्फत प्रशासनाला जनतेच्या दारात आणले असून जनतेने या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले.राजुरा तालुक्यातील देवाडा येथे महसूल विभागाद्वारे महाराजस्व विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, सरपंच लक्ष्मीबाई पंधरे, नायब तहसीलदार बन्सोड, आईदलवार, भाजपा महामंत्री दिलीप वांढरे, वामनराव तुरानकर, उपसरपंच अब्दुल जावेद, मंजुषा अनमुलवार, ईश्वर मुंडे, शिवा बोकुर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार धोटे पुढे म्हणाले, नागरिकांच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाराजस्व अभियान ही महत्त्वाकांशी योजना सुरु केली. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे, अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच जनतेच्या सोईकरिता योजनेच्या अर्जामध्ये सुटसुटीकरण केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच जनतेने कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. या शिबिरात संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, याबाबतचे अर्ज स्वीकारून तात्काळ निर्णय घेण्यात आल. त्यानंतर आ. अ‍ॅड संजय धोटे यांच्या हस्ते शेतकºयांना सातबाराचे वितरण करण्यात आले. संचालन श्रीनिवास मंथनवार यांनी केले.