शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

महाराजस्व अभियानामार्फत शासन जनतेच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:16 IST

राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात.

ठळक मुद्देसंजय धोटे : देवाड्यात महाराजस्व अभियान योजनेला सुरुवात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या जनहितकारी योजना पोहोचत नाही. जे नागरिक या योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यांना कागदपत्रासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शासनाचा मुळ उद्देश सार्थ होत नाही. त्यामुळे शासनाने आता प्रशासनाच जनतेच्या दारात नेण्याचा व ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराजस्व अभियानामार्फत प्रशासनाला जनतेच्या दारात आणले असून जनतेने या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले.राजुरा तालुक्यातील देवाडा येथे महसूल विभागाद्वारे महाराजस्व विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, सरपंच लक्ष्मीबाई पंधरे, नायब तहसीलदार बन्सोड, आईदलवार, भाजपा महामंत्री दिलीप वांढरे, वामनराव तुरानकर, उपसरपंच अब्दुल जावेद, मंजुषा अनमुलवार, ईश्वर मुंडे, शिवा बोकुर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार धोटे पुढे म्हणाले, नागरिकांच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी महाराजस्व अभियान ही महत्त्वाकांशी योजना सुरु केली. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे, अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच जनतेच्या सोईकरिता योजनेच्या अर्जामध्ये सुटसुटीकरण केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच जनतेने कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. या शिबिरात संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, याबाबतचे अर्ज स्वीकारून तात्काळ निर्णय घेण्यात आल. त्यानंतर आ. अ‍ॅड संजय धोटे यांच्या हस्ते शेतकºयांना सातबाराचे वितरण करण्यात आले. संचालन श्रीनिवास मंथनवार यांनी केले.