शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

गोवरीवासीयांनी तिसऱ्यांदा रोखला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.  मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे  धुळीचा त्रास सुरू झाल्याने  ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन  केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तिसऱ्यांदा रस्ता रोको करून वाहतूक रोखून धरली.  तब्बल तीन तास कोळसा वाहतूक रोखली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : बल्लारपूर  वेकोलीअंतर्गत गोवरी डीप कोळसा खदानीतून होणारी अवजड वाहतूक थांबवण्यासाठी नागरिकांनी २ सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन केले होते. तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. वेकोलीचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.  मात्र, दोन दिवसातच पुन्हा ओव्हरलोड वाहतुकीमुळे  धुळीचा त्रास सुरू झाल्याने  ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा चक्काजाम आंदोलन  केले. त्यानंतर वेकोलीने आश्वासन न पाळल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आणि आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तिसऱ्यांदा रस्ता रोको करून वाहतूक रोखून धरली.  तब्बल तीन तास कोळसा वाहतूक रोखली होती.गावकऱ्यांना दिलेले आश्वासन वेकोली अधिकाऱ्याने पाळले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भास्कर जूनघरी, विकास पिंपळकर यांच्या नेतृत्त्वातील गावकऱ्यांनी चक्का जाम केले. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या चक्का जाम आंदोलनात वेकोलीच्या गोवरी डीप कोळसा खाण व्यवस्थापनाने गोवरी मुख्य रस्त्यावर पाणी मारण्याचे  लेखी आश्वासन दिले. चौकात सुरक्षारक्षक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही दिवसांपासून टँकरने पाणी मारणे बंद आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा गावकऱ्यांनी कोळसा वाहतूक रोखून धरली. त्यानंतर समस्या सोडविण्याचे आश्वासन वेकोली अधिकाऱ्यांनी दिले. वेकोलीने या मार्गावर चालणाऱ्या वाहतुकीबाबत दिलेले आश्वासन पाळले नाही तर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून कोळसा वाहतूक होऊ दिली जाणार नाही, असा इशारा भास्कर जूनघरी यांनी वेकोली अधिकाऱ्यांना दिलेला आहे.

या समस्यांनी नागरिक वैतागलेरस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. सिक्युरिटी गार्डचा पत्ता नाही. धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र, वेकोलीचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. रस्त्याच्या कडेला झुडपे जंगले वाढलेली आहेत. त्यामुळे वळणावरून येताना समोरचे नागरिक दिसत नाहीत. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गोवरी, पोवनी, साखरी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते. यामुळे रस्त्याचे तीन-तेरा वाजलेले आहेत. रस्त्यावर प्रचंड महाकाय खड्डे पडलेले आहेत. 

 

टॅग्स :agitationआंदोलन