शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोसेखुर्द, आसोलामेंढाचे पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:35 IST

मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देमान्सून लांबल्यामुळे शासनाचा निर्णय । खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिले आहे. यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.या अनुषंगाने आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग सावलीचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनवणे यांनी पत्रकाद्वारे लाभधारकांना व पाणीवापर संस्थांना माहिती दिली आहे. पावसाला विलंब होत असून रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन खरीप हंगामाकरिता आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र. २ या कार्यालयाने आसोलामेंढा धरणात उपलब्ध पाण्याच्या साठ्यानुसार व शेतकºयांच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.१ जुलै ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी मिळविण्याकरिता संस्थेच्या लाभधारकांनी त्यांची पाण्याची मागणी अर्ज संबंधित पाणीवापर संस्थेकडे सादर करावे, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.सूर्याचे आग ओकणे सुरूचमार्च महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. दोन-चार दिवसांचा अपवाद सोडला तर जूनच्या १५ तारखेपर्यंत सूर्याचे हे आग ओकणे सुरूच आहे. सातत्याने पारा ४५-४६ अंशापार जात असल्याने जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. पाण्याची पातळीही खालावली आहे. जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी दिलासा देणारा मान्सूनपूर्व पाऊसही यंदा आला नाही. त्यामुळे खरीप हंगामच अडचणीत आला आहे. मात्र आता गोसेखुर्द व आसालामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी देण्यात येणार असल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प