शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गोसेखुर्द, आसोलामेंढाचे पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:35 IST

मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देमान्सून लांबल्यामुळे शासनाचा निर्णय । खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब लक्षात घेता यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता १ जुलैपासून गोसेखुर्द व असोलामेंढा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा निर्णय गोसेखुर्द प्रकल्प मंडळ, नागपूरचे अधीक्षक अभियंता यांनी १० जून रोजी घेतला व तसे निर्देश दिले आहे. यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.या अनुषंगाने आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग सावलीचे कार्यकारी अभियंता आर.आर.सोनवणे यांनी पत्रकाद्वारे लाभधारकांना व पाणीवापर संस्थांना माहिती दिली आहे. पावसाला विलंब होत असून रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन खरीप हंगामाकरिता आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र. २ या कार्यालयाने आसोलामेंढा धरणात उपलब्ध पाण्याच्या साठ्यानुसार व शेतकºयांच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.१ जुलै ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी मिळविण्याकरिता संस्थेच्या लाभधारकांनी त्यांची पाण्याची मागणी अर्ज संबंधित पाणीवापर संस्थेकडे सादर करावे, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले आहे.सूर्याचे आग ओकणे सुरूचमार्च महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे. दोन-चार दिवसांचा अपवाद सोडला तर जूनच्या १५ तारखेपर्यंत सूर्याचे हे आग ओकणे सुरूच आहे. सातत्याने पारा ४५-४६ अंशापार जात असल्याने जिल्ह्यातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. पाण्याची पातळीही खालावली आहे. जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी दिलासा देणारा मान्सूनपूर्व पाऊसही यंदा आला नाही. त्यामुळे खरीप हंगामच अडचणीत आला आहे. मात्र आता गोसेखुर्द व आसालामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी देण्यात येणार असल्याने काहिसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प