शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:56 AM

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठे नुकसान : शंभर हेक्टर शेती पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण व नायब तहसीलदार निलेश खटके यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती सुधारल्यानंतर पंचनामा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या धान रोवणी करण्याचे काम सुरु आहे. लाखापूर भागात रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाळ फुटल्याने पिकांच्या आशेवर जगणाºया शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नहर फूटण्याच्या घटना या विभागात निरंतर घडत आहे. काही दिवसांपूर्वी तोरगाव (खुर्द) येथील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र प्रशासनाने कोणतेही प्रतिबंधक उपाय योजना केल्या नाही. त्यानंतर पुन्हा बुधवारी लाखापूरशेजारील नहर फूटला. या पाण्यामुळे विनोद राऊत, जयपाल राऊत, अनमोल राऊत, स्मिता राऊत, बबन ढोरे, नरेश डोंगरवार, पांडुरंग राऊत, गुंजनराव राऊत, कौशल्य वलके, रवींद्र शेंडे आदी शेतकºयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी नहराच्या निकृष्ट कामाविषयी वारंवार तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने याविषयी गंभीर दखल न घेतल्याने नहराची पाळ फूटून शेतजमीन पाण्याखाली आली. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी शेतकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प