शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

‘त्या’ शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:40 IST

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कमी मोबदला देऊन संपादित केल्या. मात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करीत आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोसेखुर्दच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कमी मोबदला देऊन संपादित केल्या. मात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करीत आहेत. त्यांना अतिरिक्त मोबदला देण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वी संपादित केलेल्या शेतमालकावर अन्याय होत असल्याने त्या शेतकऱ्यांनासुद्धा वाढीव मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मागील नऊ-दहा वर्षांपूर्वी नवरगाव परिसरात गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे काम सुरू करण्यात आले. तेव्हाचे कार्यकारी अभियंता व कंत्राटदार गोसेखुर्द कार्यालय नागभीड विभाग क्रमांक ३ यांनी शेतजमीन संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करून त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे २०१०-११ मध्ये काही शेतकऱ्यांना समजावून तर काहींवर दबाव टाकून शेतजमिनी संपादित केल्या. मात्र काही शेतकऱ्यांनी विरोध करीत जमीन देण्यास नकार दिला. परिणामी उजव्या कालव्याचे काम अर्धवट झाले आहे. त्यावेळी संपादित केलेल्या जमिनी अत्यल्प भाव देण्यात आला. तर जमिनी संपादित केल्यामुळे शेतकºयांना दहा वर्षांपासून सदर जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नापासून मुकावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. मात्र अलिकडे ज्या शेतकऱ्यांनी जमीन संपादित करीत आहेत. अशा शेतकºयांना शासनाने २०१८ मध्ये आजच्या बाजारभाव मुल्याने किंमत दिली. त्यावरही २५ टक्के वाढ दिली. त्यामुळे या शेतकऱ्यांना चारपट मोबदला दिला. मात्र पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांनाही आजच्या बाजारभावानुसार फरकाची रक्कम देवून विक्रीपत्र नोव्हेंबर महिन्यात द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी प्रकाश बावणकर, विनोद गहाणे, राजू लांजेवार, मनोहर गहाणे, गुलाब गायकवाड, मधुकर बन्सोड, गणपत गहाणे, अरविंद कामडी, विजय प्यारमवार आदी उपस्थित होते.