शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

गोसीखूर्दच्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:29 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देअशोक नेते : शेतकरी व अधिकाऱ्यांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या गोसीखूर्द प्रकल्पाच्या कालव्यांचे काम मोठया प्रमाणात सुरु आहेत. त्या कालव्यांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करताना वेगवेगळया गावांना वेगवेगळे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात नाराजीचा सूर दिसून येत आहे. या कालव्यांसाठी जमिनी देण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे आज त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. तेव्हा प्रत्येक गावातील खरेदी, विक्रीचे दर वेगवेगळे असून त्या खरेदी विक्रीच्या आधारावर दर निश्चित केलेले आहेत. त्यामुळे अशी तफावत दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीचे एकच दर देण्यात येवून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली. तेव्हा या दोन्ही मागण्यांचा विचार करुन त्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना न देता शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे ज्या बँका शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत, अशा बँकावर कडक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. ज्यांनी आॅफलाईनव्दारे कर्जमाफीचे अर्ज केलेले आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पAshok Neteअशोक नेते