शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोसीखूर्दच्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:29 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देअशोक नेते : शेतकरी व अधिकाऱ्यांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्यामधून जाणाऱ्या गोसीखूर्द प्रकल्पाच्या कालव्यांचे काम मोठया प्रमाणात सुरु आहेत. त्या कालव्यांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करताना वेगवेगळया गावांना वेगवेगळे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात नाराजीचा सूर दिसून येत आहे. या कालव्यांसाठी जमिनी देण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे आज त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. तेव्हा प्रत्येक गावातील खरेदी, विक्रीचे दर वेगवेगळे असून त्या खरेदी विक्रीच्या आधारावर दर निश्चित केलेले आहेत. त्यामुळे अशी तफावत दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीचे एकच दर देण्यात येवून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली. तेव्हा या दोन्ही मागण्यांचा विचार करुन त्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना न देता शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे ज्या बँका शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत, अशा बँकावर कडक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. ज्यांनी आॅफलाईनव्दारे कर्जमाफीचे अर्ज केलेले आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पAshok Neteअशोक नेते