शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला वाढीव मोबदला द्या-शिवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:19 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखुर्द प्रकल्प अंतर्गत नहराच्या बांधकामाकरिता संपादीत केल्या होत्या़ सन २०१५ मध्ये जिल्हा समितीने विक्रीचे भाव निर्धारीत केले. त्यानुसार संपादीत शेतजमिनीची विक्री करण्यात आली.

ऑनलाईन लोकमतब्रह्मपुरी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखुर्द प्रकल्प अंतर्गत नहराच्या बांधकामाकरिता संपादीत केल्या होत्या़ सन २०१५ मध्ये जिल्हा समितीने विक्रीचे भाव निर्धारीत केले. त्यानुसार संपादीत शेतजमिनीची विक्री करण्यात आली. मात्र २०१५ नंतर दरवर्षी वाढीव भाव द्यावा, या सूचनेचे पालन करावे. या मागणीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना शेतकºयांनी साकडे घातले़२०१५ नंतर होणाऱ्या जमिनीच्या विक्रीला वाढीव भाव देण्याची व पिंपळगाव (भो.) ला लागून असलेल्या खामतळोधी रिठ उठीत गावालाही पिंपळगावचा दर लागू केला नाही़ त्यामुळे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला झाला, असा आरोप शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी केला़पिंपळगाव व भालेश्वर येथील शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी काळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री, परिवहन मंत्री व जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडेही तक्रार केली आहे़ यासंबंधात पहिली बैठक पिंपळगाव (भो.) ग्रामपंचायत कार्यालयात १३ मार्च २०१८ ला पार पडली़ यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता बोबडे उपस्थित होते़ शेतकऱ्यांच्या वतीने भूसंपादीत जमिनीला वाढीव दर देण्यात यावा, ठराव सर्वानुमते घेण्यात आला़ त्यानंतर गोसेखुर्दचे कार्यकारी अभियंता हटवार यांच्याशी कार्यालयात चर्चा झाली. मात्र न्याय मिळाला नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाºयांना साकडे घालून समस्येकडे लक्ष वेधले़ न्याय मिळाला नाही, तर आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे माजी शहर प्रमुख शामराव भानारकर, पांडुरंग ठेंगरे, नारायण दोनाडकर, जनार्दन दोनाडकर, माधव उरकुडे, विलास बेदरे, कौसल्या दोनाडकर, रमेश दोनाडकर, सुधीर दोनाडकर, अण्णा ठेंगरे, पांडुजी ठेंगरे, हिवराज दोनाडकर, पंढरी उरकुडे, प्रा. श्रीराम दोनाडकर, योगेश ठाकरे, भगवान रामटेके व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते़