शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे पॅकेज द्या

By admin | Updated: December 11, 2014 23:04 IST

राज्यामध्ये अल्पप्रमाणात पाऊस पडल्यामुळे १९७२ पेक्षाही मोठ्या प्रमाणात भयावह अशी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. धान, सोयाबीन, कापूस आदी पिके पुर्णत: उद्धवस्त झाले

चंद्रपूर : राज्यामध्ये अल्पप्रमाणात पाऊस पडल्यामुळे १९७२ पेक्षाही मोठ्या प्रमाणात भयावह अशी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. धान, सोयाबीन, कापूस आदी पिके पुर्णत: उद्धवस्त झाले असून शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी खरीप हंगामातील नुकसानीबाबत शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपये व रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना किमान २५ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेतील सभागृहात दुष्काळाच्या चर्चेवर बोलताना केली.विजय वडेट्टीवार म्हणाले, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता शेतकऱ्यांची भूमिका आपणासमोर मांडत आहे. गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना दुष्काळी संकटाला समोर जावे लागत आहे. यावर्षी तर भयानक परिस्थिती आहे. अल्प पावसामुळे सोयाबीन, धान, कापूस, ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुबार तिबार पेरणी केली. परंतु अल्प पावसामुळे संपुर्ण पिके उदध्वस्त झालीत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सिंचनाअभावी वर्षातून फक्त एकदाच पिक घेण्यात येते. परंतु अल्प पावसामुळे याही जिल्ह्यातील पिके हातची गेल्याने नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना या चारही जिल्ह्यात घडत आहेत. हिच परिस्थिती कापूस, सोयाबीन पिकविणाऱ्या जिल्ह्यात सुद्धा असुन दररोज किमान तीन ते चार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गेल्या चार महिन्यात आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. उत्पादन कमी होऊनही भाव अल्पचमागील वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले तर यावर्षी कमी प्रमाणात उत्पादन होवून सुध्दा भाव मिळत नसल्याने शेतकरी पुर्णत: हवालदिल झालेला आहे. त्यामुळे धान, सोयाबिन, कापूस, ऊस या भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी. सोयाबिन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच सोयाबिन, धान, कापूस पिकविणाऱ्यांना खरीप हंगामासाठी ५० हजार रुपयांचे तर रब्बी हंगामासाठी २५ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात यावे. शेतकऱ्यांवर असलेले पीक कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. (प्रतिनिधी)