शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

सीआरएफमधून २५ कोटी द्या

By admin | Updated: October 25, 2016 00:41 IST

भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासाठी तसेच गवराळा प्रभागातील चिरादेवीकडे जाणाऱ्या...

भद्रावतीत विकास कामे : नितीन गडकरी यांना साकडेभद्रावती : भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासाठी तसेच गवराळा प्रभागातील चिरादेवीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या विकासात्मक कामासाठी केंद्रीय रस्ते, परिवहन व जहाज मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) योजनेअंतर्गत २५ कोटी रुपये देण्याची मागणी माजी नगरसेवक नाना दुर्गे यांनी केली आहे.भद्रावती शहरामध्ये पवित्र नाग मंदिर, जैन मंदिर, बुद्ध लेणी, गणेश मंदिर, भवानी माता मंदिर तसेच रेल्वे स्टेशन असून अशा विविध समाजाच्या भावनाशी जुळून असलेले पर्यटन व तीर्थस्थळ आहे. भद्रावती शहराला एकमेव मुख्य रस्ता असून या रस्त्याला खुप खड्डे पडलेले आहेत. या मुख्य रस्त्याच्या कामासाठी नगर परिषदेचा निधी कमी पडत असल्याने सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे माजी नगरसेवक नाना दुर्गे यांनी केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन व जहाज नितीन गडकरी यांचेकडे धाव घेऊन भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्याच्या बांधकामासाठी प्रत्यक्ष निवेदन देऊन २५ कोटी रुपये केंद्रीय मार्ग निधी मधून देण्यात यावे. दोन्ही अति महत्त्वाचे रस्ते असून शासन जी.आर. भारत सरकारचे राजपत्र १० जुलै २०१५ नुसार सी.आर.एफ. निधीच्या निकषात बसत असल्याने रस्त्याचे कामे तात्काळ मंजूर करण्यात यावे, अशी मागणी केली. ना. गडकरी यांनी भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही कामासाठी तात्काळ २५ कोटी रुपये केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत देण्यात यावे, अशी मागणी दुर्गे यांनी प्रत्यक्ष निवेदन देऊन केली आहे. यावेळी प्रामुख्याने विक्रांत बिसेन, किशोर बेलेकर, सचिन जयस्वाल, दिलीप दुर्गे, श्रीकांत आस्वले, महादेव राऊत, हरी पोहनकर, मंगेश दानव, राजू आडे, दिलीप किन्नाके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)अहीर व मुनगंटीवार यांना निवेदनहायवे रोड पेट्रोलपंप ते रेल्वे स्टेशनपर्यंत काँक्रीट रस्त्याचे काम करण्यासाठी २० कोटी रुपये लागतात. तसेच गवराळा गावातून चिरादेवीकडे जाणारा टीपार्इंटपर्यंत आणि ४ ते ५ गावांचा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढा खर्च नगर परिषद करू शकत नसल्याने या दोन्ही रस्त्याचे काम थंडबस्त्यात असून पर्यटन स्थळ असलेल्या गावाचे तीन-तेरा वाजले आहेत. भद्रावती शहरातील अतिमहत्त्वाच्या मुख्य रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांना २८ जून २०१५ ला निवेदन दिले. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ७ मार्च २०१५ ला निवेदन देण्यात आले आहे.