शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

विवाहासाठी मुलींनाही हवा आता जमीनधारक पती

By admin | Updated: December 25, 2015 00:24 IST

विवाह हा प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा क्षण. आपल्या मुलीला भावी आयुष्याचा चांगला जोेडीदार मिळावा ही प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते.

मुलाकडे सातबाराची अट : बदलत्या काळात विवाहाचे संदर्भही बदललेप्रकाश काळे गोवरीविवाह हा प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा क्षण. आपल्या मुलीला भावी आयुष्याचा चांगला जोेडीदार मिळावा ही प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते. मुलगी सुखा- समाधानात राहावी यासाठी पिलाची धडपत सुरू असते. मात्र हे सारे पाहताना मुलाकडे जमिनी एक तुकडा असावा अशी अट मुलींनीही घातली असल्याने बदलत्या काळात विवाहाचे संदर्भही बदलत चालले आहे.विवाह म्हटला तर आनंदाची पर्वणीच लग्नातील माहोल हा अनेकांना वेगळाच आनंद देऊन जातो. पूर्वी लग्नाची पद्धत वेगळी होती. आई- वडिलांच्या पसंतीवरच मुलीच्या भावी जोडीदारासोबत साता जन्माची रेशमी गाठ बांधावी लागत होती. त्यावेळी मुलीची पसंती विचारात घेतली जात नव्हती. आई-वडिलांनी जो वर निवडला आहे, त्याच्याशी लग्न लावून दिल्या जात होते. मुलगीही वडिलांच्या शब्दाबाहेर जात नसल्याने दिल्या घरी सुखी राहत होती. मात्र आज काळ बदलला. या काळासोबत विवाहाचे संदर्भ बदलत चालले आहेत. व्हॉटसअ‍ॅप फेसबुकच्या जगात तरुणाईचे भावविश्व वेगळे आहे. आपली मुलगी आयुष्यभर सुखात राहावी हे प्रत्येक आई- वडिलांचे स्वप्न असते. मात्र बदलत्या काळात मुलींच्याही भावनांचा विचार करीत तिला तिच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याची संधी घरच्यांनी दिली आहे. विवाहासाठी सज्ज झाल्यानंतर मुलांचे घरदार, नोकरी याला पहिली पसंती असायची. परंतु मुलांकडे आता घरदार, संपत्ती आणि नोकरीच असून चालत नाही. तर त्याच्याकडे जमिनीचा कोरभर तुकडा असावा, असा मानस आज व्यक्त होत असल्याने नोकरीसोबत मुलांकडे सातबाराची अट मुलींकडून घातली जात आहे. तुळशी विवाहानंतर विवाहासाठी, साक्षगंध व पाहणीचे कार्यक्रमाचे मोठ्या लगबगीने पार पाडले जात आहे. मुलाकडील व मुलींकडील मंडळ पाहणीच्या कार्यक्रमात व्यस्त झाली आहेत. मुलगी आयुष्यभर सुखात राहावी. यासाठी वधूपित्याची धडपड चालली आहे. विवाह एकदाच होत असल्याने मुलींसाठी चांगले स्थळ पाहण्यासाठी सुरुवात झाली आहे.लग्न जुळवून बऱ्यापैकी आता लग्नालाही सुरुवात झाली आहे. भावी जोडीदारासोबत विवाह करण्यासाठी मुलींची पसंती आता विचारात घेतली जात आहे. त्यामुळे काळाच्या ओघात लग्नाची प्रक्रीया हळूहळू बदलत जात आहे. भावी जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मुलींना मिळाले असले तरी घरातील वडिलाच्या शब्दाबाहेर मुलगी आजही जात नाही, हे वास्तव आजही कायम आहे. लाडात वाढविलेली लेक परक्या घरी देताना मुलगी आयुष्यभर सुखात राहावी हिच आई- वडिलांची माफक इच्छा असते. मुलाकडील किंवा मुलीकडील घराणेशाहीला आजही तितकीच पसंती दिली जाते. घराणेशाहीच्या बळावर आजही विवाह उरकले जाते. ही पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा कायम आहे.काळ बदलल्याने काळासोबत माणसाला बदलावे लागते. हा एक नियम आहे. त्यानुसार विवाह सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदला झाला आहे. आजच्या काळात नोकरी आणि विवाह हे समीकरण तयार झाले आहे. परंतु नोकरीसोबतच मुलांकडे जमिनीचा सातबारा असावा हा नवा विचार जनमानसात चांगला रुढ होत चालला आहे. त्यामुळे भावी नववधू, भावी वराकडे सातबारा असावा अशी अट घालत असल्याचे चित्र समाजात पहायला मिळत आहे.