शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुसला अखेर नगर परिषदेचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST

चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीला नववर्षाच्या पूर्वसंध्येला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे. ...

चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीला नववर्षाच्या पूर्वसंध्येला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे. याबाबतचा अध्यादेश राज्याच्या नगर विकास विभागाने गुरुवारी काढून यावर शिक्कामोर्तब केले आहे. मागणी पूर्ण झाल्याने घुग्घुसवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकला होता. ही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विजय वडेट्टीवार यांनी घुग्घुसवासीयांच्या वतीने शासनदरबारी रेटून धरली. अखेर राज्य शासनाने घुग्घुसवासीयांच्या भावनेचा आदर राखत नववर्षाची भेट दिली.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच पालकमंत्री वड्डेटीवार यांनी एका पत्रकार परिषदेत घुग्घुस नगर परिषदेला हिरवी झेंडी दाखविली होती. यानंतर लगेच ३१ ऑगस्ट २०२० रोजी घुग्घुस नगर परिषदेची प्रथम अधिसूचना शासकीय स्तरावर जाहीर करण्यात आली. अशातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. यामध्ये घुग्घुस ग्रामपंचायतीचीही निवडणूक जाहीर झाली. मात्र घुग्घुस येथील सर्वच राजकीय पक्षांनी हातात हात घालून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यासोबतच विविध प्रकारच्या आंदोलनाची मालिकाच सुरू केली. हे आंदोलन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत सुरूच होते. घुग्घुस येथून ग्रामपंचायतीसाठी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. या बाबीला २४ तास उलटत नाही तोच राज्य शासनाने घुग्घुसला नगर परिषदेचा दर्जा बहाल केला. इतकेच नव्हे, तर नगर विभागाने याबाबतचा अध्यादेशही काढला.

जिल्ह्यात आता १० नगर परिषदा

चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुसच्या रूपाने नव्या नगर परिषदेची भर पडली आहे. जिल्ह्यात बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल या नऊ नगर परिषदा अस्तित्वात आहे. घुग्घुसची भर पडल्याने जिल्ह्यात आता नगर परिषदांची संख्या १० झाली आहे. यासह सहा नगर पंचायतीही आहेत. चंद्रपूरला महानगरपालिकेचा दर्जा आधीच मिळाला आहे.

कोट

घुग्घुस येथे नगर परिषद स्थापन करण्यात यावी, अशी मागणी त्या परिसरातील हजारो नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु याकडे एकाही राजकीय नेत्याने लक्ष दिले नाही. ही बाब घुग्घुस येथील काँग्रेसचे राजू रेड्डी व कार्यकर्त्यांनी लक्षात आणून देताच स्वतः नगर परिषद स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रयत्नाला यश आले आहे. अखेर घुग्घुस येथे नगर परिषदेची स्थापना करण्यात आली असून त्यासंदर्भात आज अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही घुग्घुसवासीयांना नवीन वर्षाची भेट आहे.

- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर.