शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घुस, गोंडपिपरी, बल्लारपूर सोमवारपासून लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असून नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे व गरज नसताना घराबाहेर न पडणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यांमधील संख्या कमी करायची असल्यास संपर्कातून तयार होणारे रुग्ण कमी झाले पाहिजे.

ठळक मुद्देआणखी दोघांचा मृत्यू : जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ११०५

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोमवारपासून घुग्घुस, गोंडपिंपरी व बल्लारपूर या तीन शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११०५ बाधित पुढे आले आहे. सध्या ३७६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. ७१८ बाधितांना आतापर्यत सुटी मिळाली आहे. शुक्रवारी रात्री एका ६५ वर्षीय बल्लारपूर येथील महिलेचा मृत्यू झाला. तर रविवारी नगिनाबाग चंद्रपूर येथील एका ५४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील नऊ बाधितांचा आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येत असून नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे व गरज नसताना घराबाहेर न पडणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यांमधील संख्या कमी करायची असल्यास संपर्कातून तयार होणारे रुग्ण कमी झाले पाहिजे. त्यासाठी गृह अलगीकरणात असणाऱ्या नागरिकांपासून तर बाधित नागरिकांपर्यंत आपल्यापासून इतरांना बाधा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील तीन प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. बल्लारपूर, गोंडपिंपरी व घुग्घुस हे तीन शहर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस ग्रामपंचायतमध्ये रविवारपासून रात्री आठ वाजल्यापासून 20 ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने, आस्थापना संपूर्णता बंद राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. बल्लारपूर शहरातील रुग्णसंख्या शंभराच्या वरती पोचली आहे. त्यामुळे सोमवार १७ ऑगस्ट पहाटेपासून २१ तारखेपर्यंत बल्लारपूर -बामणी बंद राहणार आहे. गोंडपिंपरीत कोरोनाने शिरकाव केला आहे. १६ ऑगस्टपासून २२ तारखेपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात २१ व २२ तारखेला फक्त जीवनावश्यक सेवा सकाळी ९ ते ते दुपारी २ पर्यंत सुरू राहील.असे आहेत नवे बाधितशनिवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक बाधित हे बल्लारपूर शहरातील आहेत. या शहरातील आतापर्यंत बाधिताची संख्या शंभरावर गेली. शनिवारी १५ बाधित पुढे आले आहे. चंद्रपूर महानगर बाधितांच्या संख्येत मागे नाही. या ठिकाणी ११ बाधित पुढे आले आहे. याशिवाय राजुरा आठ, चिमूर एक, वरोरा दोन, भद्रावती दोन, कोरपना तालुका एक व एक नागरिक तेलंगणा येथील रहिवासी आहे. रविवारी आढळलेल्या नव्या बाधितांमध्ये सर्वाधिक बाधीत हे राजुरा येथील असून राजुरा तालुक्यातून ११ बाधित पुढे आले आहे. त्यानंतर चंद्रपूर शहरातील रुग्ण वाढ कायम असून रविवारी १० बाधित पुढे आले आहे. तुकूम, ऊर्जानगर, रयतवारी कोलरी, पोलीस कॉटर परिसरातील हे रुग्ण आहेत. मूल येथील सहा बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या ११ नागरिकांपैकी नऊ बाधित जिल्ह्यातील आहे. या नऊ बाधितांपैकी मृत्युमुखी पडणाऱ्यामध्ये अन्य आजाराचे प्रमाण अधिक होते. कोरोनाशिवाय त्यांना अन्य गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या