शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सावली येथे घागर मोर्चा

By admin | Updated: October 22, 2016 00:50 IST

वीज बिलाचा भरणा केला नसल्याने गेल्या १० दिवसांपासून टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे.

महिलांचा सहभाग : १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्पसावली : वीज बिलाचा भरणा केला नसल्याने गेल्या १० दिवसांपासून टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे सावलीसह १० गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी सोमवारी नगरपंचायतीवर घागरमोर्चा काढण्यात आला. शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना २००८ रोजी कार्यान्वित करण्यात आली. योजनेत सावलीसह १० गावांचा समावेश करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र, या विभागाने पाणीपट्टी वसुली केलीच नाही. त्यामुळे वीजबिलाचा भरणा करण्यात आलेला नाही. वारंवार सांगितल्यावरही वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बंद केला. परिणामी गेल्या १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावकऱ्यांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढला. प्रमोद गेडाम यांच्या नेतृत्त्वात मोर्चा निघाला. माजी सरपंच अतुल लेनगुरे, रवी डोहणे, जयप्रकाश दुधे, राणीताई मोटघरे यांच्यासह शेकडो महिलांचा समावेश होता. पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासह अन्य १६ मागण्यांसाठी मोर्चा निघाला. निवेदन नगराध्यक्षासह मुख्याधिकारी माधुरी सलामे यांना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)पाणीपट्टी भरुन सहकार्य करावेनगरपंचायतीत सत्तेवर येऊन ११ महिने झाले. पूर्वी ग्रामपंचायतीत सत्तेत असलेल्यांनी २ लाख ८८ हजार रुपये थकीत ठेवले होते. आम्ही आतापर्यंत एक लाखांच्या पाणीपट्टीचा भरणा केला आहे. नागरिकांनी नियमित पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन नगराध्यक्ष रजनीताई भडके यांनी केले.