शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नगर पंचायतवर घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 22:35 IST

मागील १९ दिवसापांसून सावलीतील जलप्राधिकरणाची नळयोजना बंद आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देपंधरवड्यापासून नळयोजना बंद : उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठी पायपीट

आॅनलाईन लोकमतसावली : मागील १९ दिवसापांसून सावलीतील जलप्राधिकरणाची नळयोजना बंद आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे नळयोजना त्वरित सुरू करून पाण्याची सोय करावी, या मागणीसाठी मंगळवारी माजी उपसरपंच नरेंद्र डोहणे यांच्या नेतृत्वात महिलांचा घागर मोर्चा नगर पंचायतींवर धडकला.सावली शहरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या मार्फतीने शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची देखरेख नगर पंचायतीकडे आहे. मात्र मागील १९ दिवसांपासून ही नळयोजना बंद आहे. त्याचा नाहक त्रास येथील जनतेला सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. या मोर्चात शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, नरेंद्र डोहणे, विरोधी पक्षनेते नगरसेवक गुणवंत सुरमवार, देवलाबाई आलेवार, गेडाम आदी महिलांनी मोर्चामध्ये मार्गदर्शन केले. यावेळी नगर पंचायतीचे पाणीपुरवठा सभापती सेवेंद्र मडावी मोर्चेकºयांना सामोरे गेले. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांची भेट घेवून पाणी समस्या सोडवावी, शौचालय घोटाळ्याची विभागीय चौकशी करावी तसेच स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी करण्यात आली. मुख्याधिकारी सलामे यांनी मागण्या मान्य करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच अल्पावधीतच नळ योजना सुरू होईल, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष उपस्थित नसल्याने महिलांनी रोष व्यक्त केला. यावेळी ठाणेदार स्वप्निल धुळे यांचा नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.