शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सामान्य नागरिकांनी चीनविरोधात लढा उभारला पाहिजे -गोविंदाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:42 IST

भारतातील सामान्य नागरिकांनी चीनविरोधात सामाजिक लढा उभारला पाहिजे, व चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे,

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतातील सामान्य नागरिकांनी चीनविरोधात सामाजिक लढा उभारला पाहिजे, व चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वाभिमानी आंदोलनाचे संस्थापक, संरक्षक के. एन. गोविंदाचार्य यांनी केले.चंद्रपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वदेशी जागरण मंचाचे प्रमुख प्रा. अजय पत्की, राष्टÑीय संयोजक पवनकुमार श्रीवास्तव, राष्टÑीय संघटन मंत्री बसवराज पाटील, युवा नेता सुरक्षा सेल प्रमुख अभिमन्यू कोहाड, सहसंयोजक राजश्री चौधरी, राष्टÑीय मंत्री, प्रदीप नागपुरकर, भुला महाजन, चंद्रपूर सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तिराणीक आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते तसचे विदर्भ प्रचारक भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनाचे प्रमुख रवींद्र तिराणिक म्हणाले, चीनसारख्या राष्टÑाशी सीमेवर आपले सैन्य दोन हात करीत आहे. त्यांच्या जोडीने नागरिकांनीही चीन विरोधात लढ्यात सहभागी झाले पाहिजे, व चीनला धडा शिकवला पाहिजे. असे ते म्हणाले.यावेळी चिनी मालाची होळी करण्यात आली. त्यानंतर राष्टÑीय स्वाभीमान आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना गोविंदाचार्य म्हणाले, कोणत्याही देशाची ताकद ही त्या देशातील नागरिकांच्या व्यक्तिमत्वावर ठरते. देशातील नागरिक एकत्रित आणि ताकदवान असतील. तर देश ताकदवान राहतो. चीनचा सर्वकष अभ्यास करुन चिनविरोधी धोरणासाठी सामाजिक रणनिती आखणे आवश्यक आहे. सीमास्तरावर आयुधांचा मदतीने लढाई करता येईल मात्र, सामाजिक स्तरावरील लढाईसाठी सामाजाची एकता आवश्यक आहे. भारतातील सामान्य नागरीकांनी सैन्यासोबत सामाजिक लढा दिला तर चीनला देखील आपण डोईजड होऊ शकतो. चीनचा वेग आहे. तर भारताकडे क्षमता आहे. कोणत्याही स्पर्धेत टिकण्यासाठी वेग नाही, तर क्षमतेची गरज असते. हिच क्षमता टिकवून भारताला चीनविरोधी लढा द्यायचा आहे. असे ते म्हणाले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन बसवराज पाटील प्रास्ताविक अभिमन्यू कोहाड तर उपस्थिताचे आभार पवनकुमार श्रिवास्तव यांनी मानले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.