शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सामान्य नागरिकांनी चीनविरोधात लढा उभारला पाहिजे -गोविंदाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:42 IST

भारतातील सामान्य नागरिकांनी चीनविरोधात सामाजिक लढा उभारला पाहिजे, व चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे,

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतातील सामान्य नागरिकांनी चीनविरोधात सामाजिक लढा उभारला पाहिजे, व चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वाभिमानी आंदोलनाचे संस्थापक, संरक्षक के. एन. गोविंदाचार्य यांनी केले.चंद्रपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वदेशी जागरण मंचाचे प्रमुख प्रा. अजय पत्की, राष्टÑीय संयोजक पवनकुमार श्रीवास्तव, राष्टÑीय संघटन मंत्री बसवराज पाटील, युवा नेता सुरक्षा सेल प्रमुख अभिमन्यू कोहाड, सहसंयोजक राजश्री चौधरी, राष्टÑीय मंत्री, प्रदीप नागपुरकर, भुला महाजन, चंद्रपूर सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तिराणीक आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते तसचे विदर्भ प्रचारक भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनाचे प्रमुख रवींद्र तिराणिक म्हणाले, चीनसारख्या राष्टÑाशी सीमेवर आपले सैन्य दोन हात करीत आहे. त्यांच्या जोडीने नागरिकांनीही चीन विरोधात लढ्यात सहभागी झाले पाहिजे, व चीनला धडा शिकवला पाहिजे. असे ते म्हणाले.यावेळी चिनी मालाची होळी करण्यात आली. त्यानंतर राष्टÑीय स्वाभीमान आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना गोविंदाचार्य म्हणाले, कोणत्याही देशाची ताकद ही त्या देशातील नागरिकांच्या व्यक्तिमत्वावर ठरते. देशातील नागरिक एकत्रित आणि ताकदवान असतील. तर देश ताकदवान राहतो. चीनचा सर्वकष अभ्यास करुन चिनविरोधी धोरणासाठी सामाजिक रणनिती आखणे आवश्यक आहे. सीमास्तरावर आयुधांचा मदतीने लढाई करता येईल मात्र, सामाजिक स्तरावरील लढाईसाठी सामाजाची एकता आवश्यक आहे. भारतातील सामान्य नागरीकांनी सैन्यासोबत सामाजिक लढा दिला तर चीनला देखील आपण डोईजड होऊ शकतो. चीनचा वेग आहे. तर भारताकडे क्षमता आहे. कोणत्याही स्पर्धेत टिकण्यासाठी वेग नाही, तर क्षमतेची गरज असते. हिच क्षमता टिकवून भारताला चीनविरोधी लढा द्यायचा आहे. असे ते म्हणाले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन बसवराज पाटील प्रास्ताविक अभिमन्यू कोहाड तर उपस्थिताचे आभार पवनकुमार श्रिवास्तव यांनी मानले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.