शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

१३ वर्षानंतर पूर्ण होणार गोवरीचा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:43 IST

१३ वर्षांपूर्वी निधीअभावी रखडलेला गोवरी येथील बंधारा आता पूर्णत्वास येणार असून या बंधाऱ्याच्या बांधकामाला खनिज विकास निधीतून ६६.४३ लाखांची मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदासुद्धा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न हा बंधारा बांधकामानंतर पूर्णत्वास येणार आहे.

ठळक मुद्देहरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण : खनिज विकास निधीतून ६६ लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : १३ वर्षांपूर्वी निधीअभावी रखडलेला गोवरी येथील बंधारा आता पूर्णत्वास येणार असून या बंधाऱ्याच्या बांधकामाला खनिज विकास निधीतून ६६.४३ लाखांची मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदासुद्धा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न हा बंधारा बांधकामानंतर पूर्णत्वास येणार आहे.राजुरा तालुकचयातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर शासनाने २००६ बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरुवता केली. मात्र संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास नेले नाही. त्यावेळी बंधारा नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने बंधारा बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. त्यानंतर बंधारा पूर्णत्वास नेण्यााठी बंधारा समितीचे अध्यक्ष नागोबा पाटील लांडे यांनी व नागरिकांनी आमदार, खासदार व संबंधित विभागाकडे अनेकदा चकरा मारल्या. मात्र नियोजित वेळेत बंधाऱ्याचे बांधकाम न झाल्याने बंधाऱ्याचा आर्थिक बजेट वाढला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुटे यांनी बंधारा पूर्णत्वास नेण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यानंतर गोवरी येथील प्रकाश काळे यांनी या अर्धवट बंधाऱ्याची तक्रार पालकमंत्री तक्रार निवारण कक्षाकडे हॅलो चांदा अंतर्गत केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली. लोकमतनेही हा अर्धवट बंधारा पूर्णत्वास यावा, यासाठी वृत्तपत्रातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्हा खनिज निधी अंतर्गत गोवरी येथील अर्धवट बंधाऱ्याच्या बांधकामासाठी ६६ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या कामाची निविदा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न आता पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शेकडो हेक्टर शेती येणार सिंचनाखालीबल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणींमुळे या परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे हा बंधारा पूर्ण झाल्यास गोवरी येथील नागरिकांना व परिसरातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा मोठा लाभ होणार आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांना हा बंधारा वरदान ठरणारा असून या बंधाऱ्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने गोवरीवासीयांसाठी हा बंधारा अधिक लाभदायक ठरणारा आहे.

टॅग्स :Waterपाणी