शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:03 IST

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी जवळजवळ पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देलगबग वाढली : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी जवळजवळ पूर्ण केली आहे. बाप्पा आपल्या घरी राहायला येणार, म्हणून नागरिक उत्साहित झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही मंडप उभारणी, डेकोरेशन, विद्युत पुरवठा याची तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी मोठ्या उत्साहात श्रींचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.गणेशोत्सव दिवाळीनंतरचा वर्षभरातील मोठा उत्सव समजला जातो. या उत्सवामुळे दहा दिवस शहरात, गावागावात भक्तीचे वातावरण राहते. यंदा हा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मूर्तीकार महिनाभरापासूनच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. तेदेखील आता मूर्तीवर शेवटचा हात फेरताना दिसून येत आहे. शुक्रवारी बाजारपेठेत गर्दी उसळत असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीच गणेशमूर्ती घेऊन ठेवतात. त्यामुळे शहरातील हिंदी सीटी शाळेजवळ आणि छोटा बाजार चौकात गणेशमूर्र्तींची दुकाने लागली आहे. हिंदी सिटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर महानगरपालिकेकडून गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून दिले जाते.हे कामदेखील आज बुधवारी अंतिम टप्प्यात आलेले दिसले. काही सार्वजनिक गणेश मंडळे आजच आपल्या गणेशमूर्ती मंडपात नेऊन ठेवताना दिसून आले.दरम्यान, रामाळा तलाव आणि दाताळा मार्गावरील इरई नदीपात्रात नागरिकांकडून गणेशाचे विसर्जन केले जाते. अनेकजण एक दिवसानंतर गणेश विसर्जन करतात. त्यामुळे हे विसर्जनस्थळही प्रशासनाने स्वच्छ केले आहे. मनपाकडून निर्माल्यकुंडाची व्यवस्था आहे.वर्गणीतून दहा टक्के रक्कम अनाथाश्रमाला देण्याचे आदेशसावंजनिक गणेश मंडळांनी नागरिकांकडून गोळा केलेल्या वर्गणीची उधळपट्टी होऊ नये म्हणून या वर्गणीच्या रकमेवर धर्मादाय आयुक्तांची नजर असणार आहे. विशेष म्हणजे, गणेश मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीच्या रकमेतील १० टक्के रक्कम अनाथाश्रमाला द्यावी, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त एस.जी. डिगे यांनी दिले आहे. तशी नोटीस सार्वजनिक गणेश मंडळांना जारी करण्यात आली असून या संबंधीचा अहवाल स्थानिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात देण्याच्या सूचनाही गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी येथील सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करून नोंदणी करणे बंधनकारक आहे. मंडळांनी सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच धर्मदाय आयुक्तांकडून गणेशोत्सवासाठी परवानगी दिली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाकडे सामाजिक उपक्रम म्हणून बघितले जाते. समाजात एकोपा वाढवा, हा सार्वजनिक गणेशोत्सवामागील मूळ उद्देश आहे. या धार्मिक कार्यातून सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक कार्यही व्हावे या उदात्त हेतूने धर्मदाय आयुक्तांनी यावर्षीपासून हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यात सार्वजनिक गणेश मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीच्या रकमेतील दहा टक्के रक्कम अनाथाश्रमाला द्यायची आहे. ही रक्कम दिल्यानंतर त्याचा अहवाल धर्मदाय आयुक्त कार्यालयात देणे बंधनकारक आहे. या संबंधीच्या नोटीस धर्मदाय आयुक्तांकडून गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला गणेश मंडळांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.