शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:03 IST

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी जवळजवळ पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देलगबग वाढली : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी जवळजवळ पूर्ण केली आहे. बाप्पा आपल्या घरी राहायला येणार, म्हणून नागरिक उत्साहित झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही मंडप उभारणी, डेकोरेशन, विद्युत पुरवठा याची तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी मोठ्या उत्साहात श्रींचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.गणेशोत्सव दिवाळीनंतरचा वर्षभरातील मोठा उत्सव समजला जातो. या उत्सवामुळे दहा दिवस शहरात, गावागावात भक्तीचे वातावरण राहते. यंदा हा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मूर्तीकार महिनाभरापासूनच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. तेदेखील आता मूर्तीवर शेवटचा हात फेरताना दिसून येत आहे. शुक्रवारी बाजारपेठेत गर्दी उसळत असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीच गणेशमूर्ती घेऊन ठेवतात. त्यामुळे शहरातील हिंदी सीटी शाळेजवळ आणि छोटा बाजार चौकात गणेशमूर्र्तींची दुकाने लागली आहे. हिंदी सिटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर महानगरपालिकेकडून गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून दिले जाते.हे कामदेखील आज बुधवारी अंतिम टप्प्यात आलेले दिसले. काही सार्वजनिक गणेश मंडळे आजच आपल्या गणेशमूर्ती मंडपात नेऊन ठेवताना दिसून आले.दरम्यान, रामाळा तलाव आणि दाताळा मार्गावरील इरई नदीपात्रात नागरिकांकडून गणेशाचे विसर्जन केले जाते. अनेकजण एक दिवसानंतर गणेश विसर्जन करतात. त्यामुळे हे विसर्जनस्थळही प्रशासनाने स्वच्छ केले आहे. मनपाकडून निर्माल्यकुंडाची व्यवस्था आहे.वर्गणीतून दहा टक्के रक्कम अनाथाश्रमाला देण्याचे आदेशसावंजनिक गणेश मंडळांनी नागरिकांकडून गोळा केलेल्या वर्गणीची उधळपट्टी होऊ नये म्हणून या वर्गणीच्या रकमेवर धर्मादाय आयुक्तांची नजर असणार आहे. विशेष म्हणजे, गणेश मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीच्या रकमेतील १० टक्के रक्कम अनाथाश्रमाला द्यावी, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त एस.जी. डिगे यांनी दिले आहे. तशी नोटीस सार्वजनिक गणेश मंडळांना जारी करण्यात आली असून या संबंधीचा अहवाल स्थानिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात देण्याच्या सूचनाही गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी येथील सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करून नोंदणी करणे बंधनकारक आहे. मंडळांनी सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच धर्मदाय आयुक्तांकडून गणेशोत्सवासाठी परवानगी दिली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाकडे सामाजिक उपक्रम म्हणून बघितले जाते. समाजात एकोपा वाढवा, हा सार्वजनिक गणेशोत्सवामागील मूळ उद्देश आहे. या धार्मिक कार्यातून सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक कार्यही व्हावे या उदात्त हेतूने धर्मदाय आयुक्तांनी यावर्षीपासून हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यात सार्वजनिक गणेश मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीच्या रकमेतील दहा टक्के रक्कम अनाथाश्रमाला द्यायची आहे. ही रक्कम दिल्यानंतर त्याचा अहवाल धर्मदाय आयुक्त कार्यालयात देणे बंधनकारक आहे. या संबंधीच्या नोटीस धर्मदाय आयुक्तांकडून गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला गणेश मंडळांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.