शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

गडचांदूरला मिळाली नगरपालिका

By admin | Updated: August 1, 2014 00:12 IST

औद्योगिक शहर गडचांदूर येथे नगर परिषद स्थापनेबाबतची अंतीम अधिसूचना आज (दि. ३१) नगर विकास मंत्रालयाने जाहिर केली आहे. १ आॅगस्टपासून नगर परिषद अस्तित्वात येत आहे.

सुभाष धोटेंच्या प्रयत्नांना यश : मंत्रालयातून अधिसूचना जारीगडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथे नगर परिषद स्थापनेबाबतची अंतीम अधिसूचना आज (दि. ३१) नगर विकास मंत्रालयाने जाहिर केली आहे. १ आॅगस्टपासून नगर परिषद अस्तित्वात येत आहे. घोषणेमुळे गडचांदूर नगरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.४० हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहरात नगर परिषद स्थापनेची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून केल्या जात होती. आमदार सुभाष धोटे यांनी सन २०१० पासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन गडचांदूर नगर परिषद स्थापन केली आहे. गडचांदूर नगर परिषद स्थापनेसंबंधी प्राथमिक अधिसूचना ३१ आॅगस्ट २०१२ ला निघाली होती. महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर या महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून गडचांदूर नगर परिषद गठीत करण्यासाठी आक्षेप मागविले होते. या सर्व आक्षेपावर अंतिम निर्णय घेऊन तब्बल दोन वर्षानंतर अंतीम अधिसूचना निघाली आहे. अंतिम अधिसूचना काढण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. विरोधकांनी नगर परिषद स्थापनेसंबंधी अनेक अडथळे निर्माण केले होते. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीनेसुद्धा गडचांदूर नगर परिषद स्थापनेचा विरोधात ठराव घेतला होता.मात्र या सर्व अडचणीवर मात करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन अखेरीस गडचांदूर नगर परिषद स्थापनेस यश मिळाले आहे. गडचांदूर नगर परिषद स्थापनेच्या अंतिम अधिसूचनेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २४ जुलैला स्वाक्षरी केली होती. गडचांदुरात नगर परिषद स्थापनेचे वृत्त येताच सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. आज गडचांदुरात जुलूस काढून गडचांदूरवासियांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गडचांदूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गडचांदूर नगर परिषदेची नितांत गरज होती. ४० हजार लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे करणे सहज शक्य नव्हते, त्यामुळे ग्रा.पं.ची तारांबळ उडत होती. मात्र आता प्रतीक्षा संपली असून आता विकास कामांना गती प्राप्त होणार आहे. शासनाने गडचांदूर नगर परिषद स्थापनेची घोषणा केल्याबद्दल आमदार सुभाष धोटे यांचे माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी पंचायत समिती सभापती नागेराज मंगरुळकर, शहर काँग्रेस अध्यक्ष विजय ठाकूरवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष हंसराज चौधरी, माजी पं.स. सभापती महेंद्र ताकसांडे, सरपंच सुमन आत्राम, उपसरपंच पापय्या पोन्नमवार, डॉ. अनील चिताडे, विठ्ठलराव थिपे, माजी सरपंच शिवकुमार राठी, बाबाराव पुरके, डॉ. चरणदास मेश्राम, माजी शहर अध्यक्ष रमाकांत कोमावार, सतिश बेतावार, ग्रा.पं. सदस्य विक्रम येरणे, सागर ठाकूरवार, सिराज भाई, अहमद भाई, विकास भोजेकर, प्रभाकर क्षीरसागर, प्रा. शरद बेलोरकर आदींनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)