शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

भावी शिक्षक झाले बेरोजगार

By admin | Updated: July 30, 2014 23:57 IST

२० वर्षांपूर्वी डी.एड. झाले की हमखास नोकरी, असे समीकरण झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण डी.एड. करून शिक्षक होण्याचे स्वप्न बघत होते. डी.एड.ला नंंबर लागला की,

डी.एड.केले : मात्र शोधला पर्यायी व्यवसायचंद्रपूर : २० वर्षांपूर्वी डी.एड. झाले की हमखास नोकरी, असे समीकरण झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण डी.एड. करून शिक्षक होण्याचे स्वप्न बघत होते. डी.एड.ला नंंबर लागला की, स्वर्ग दोन बोटे बाकी उरायचा. मात्र अलिकडच्या काळात खासगी अध्यापक विद्यालयाच्या सुळसुळाटामुळे डी.एड. झालेल्या तरुणांची मोठी फौजच निर्माण झाली आहे. नोकरी मिळत नसल्याने आता भावी शिक्षक मिळेल ते काम करण्यात धन्यता मानत आहेत.२०-२५ वर्षांपूर्वी डी.एड. शिक्षकांना मोठ मान होता. शिक्षक होऊन ही मंडळी ज्ञानार्जनाचे काम करीत होती. काही वर्षांपासून खासगी संस्थांना शासनाने डी.एड. विद्यालयाची खिरापत वाटली. ठिकठिकाणी अध्यापक विद्यालय थाटल्या गेले. पूर्वी १२ वीत ७० टक्केहून अधिक गुण असले तरच डी.एड. ला नंबर लागायचा. मात्र खासगी अध्यापक विद्यालयामुळे कमी गुण असणाऱ्यांनाही डी.एड. मध्ये प्रवेश मिळू लागला. विद्यार्थी संंख्या कमी आणि अध्यापक विद्यालयात जास्त, अशी स्थिती निर्माण झाली. आता तर अध्यापक विद्यालयांना विद्यार्थी मिळणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थिती शेकडो तरुण डी.एड. होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही. अलीकडे डी.एड. झालेल्या तरुणांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली. गुणवत्ता यादीत स्थान मिळत नसल्याने बेरोजगार शिक्षकांची फौज गावागावात दिसत आहे. नोकरी मिळत नसल्याने तरुणांनी आता व्यवसाय स्वीकारले आहे. ज्यांच्याकडे शेती आहे ते शेतीत राबतात. कुणी कुक्कटपालन करीत आहेत. परंतु ज्यांच्याकडे शेती नाही, असे भावी शिक्षक अनेक ठिकाणी नोकरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. डी.एड. बेरोजगारांची ही अवस्था पाहून आता तरुणांनी डी.एड. कडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे आता अध्यापक विद्यालये बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत. कधीकाळी नोकरीची हमखास हमी देणारी डी.एड. आता बेरोजगारांची फौज निर्माण करणारे कारखाने झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)