शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

रात्रभर भटकत राहिले भावी पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:33 IST

चंद्रपुरात गुरुवारपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी राज्यभरात असंख्य युवक बुधवारीच चंद्रपुरात दाखल झाले. मात्र त्यांच्या निवासाची व जेवणाची कुठेही सोय नसल्याने या युवकांना बुधवारची रात्र भटकून वा मिळेल तो आसरा शोधन काढावी लागली.

ठळक मुद्देना जेवण, ना निवारा : भरती प्रक्रियेसाठी विविध जिल्ह्यातील युवक चंद्रपुरात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात गुरुवारपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी राज्यभरात असंख्य युवक बुधवारीच चंद्रपुरात दाखल झाले. मात्र त्यांच्या निवासाची व जेवणाची कुठेही सोय नसल्याने या युवकांना बुधवारची रात्र भटकून वा मिळेल तो आसरा शोधन काढावी लागली. विशेष म्हणजे, पोलीस विभागाने पोलिसांच्या जीमखाना परिसरात या युवकांची राहण्याची सोय केली होती. मात्र तशी सूचना युवकांना मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.चंद्रपुरात ९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून ११ हजार ९१ बेरोजगार युवक आपले नशिब आजमावत आहेत. यात दोन हजार ४९८ युवती तर आठ हजार ५९३ युवकांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने राज्यभरातील उमेदवार बुधवारी सायंकाळीच चंद्रपुरात दाखल झाले. यातील बहुतांश जणांनी आपल्यासोबत जेवनाचा डब्बा व इतर खाद्य पदार्थ आणले होते. यातील काही जणांनी पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या वि.दा. सावरकर स्मारकाजवळ आपले डब्बे खावून रात्र घालविली. मात्र अनेकांना तिथे जागा नसल्याने जागेचा शोध घेत रात्री शहरात भटकंती करावी लागली.पोलीस मुख्यालयासमोरच बसस्थानक असल्याने अनेक युवकांनी बसस्थानकात रात्र काढली. तर काही जणांनी रेल्वे स्थानकाचा आसरा घेतला. त्यानंतर पहाटेच्या सुमारासही या युवकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. कशाचीच सोय नसल्याने व सार्वजनिक शौचालये माहित नसल्याने पहाटेही या युवकांना शहरात भटकावे लागले. एवढे सर्व करून हे हजारो युवक पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेसाठी पहाटे ५ वाजता उपस्थित झाले. मात्र तिथेही त्यांना गैरसोयीचाच सामना करावा लागला.यवतमाळमधून आलेल्या एका युवकाने सांगितले की त्याला व त्याच्या सहकाºयांना आकाशाखाली मोकळ्या जागेवर रात्र काढावी लागली. डास व थंडीमुळे रात्रभर झोप लागली नाही. अनेक आवश्यक सुविधांसाठी पैसे खर्च करावे लागले.५९० उमेदवार पात्रगुरुवारी पहाटेपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यातील ५९० उमेदवार या चाचणीत पात्र ठरले आहे, अशी माहिती पोलीस विभागाने दिली. या चाचणीवर ज्या उमेदवारांना आक्षेप घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १० मार्चच्या आधी उमेदवारांना या चाचणी प्रक्रियेवर आक्षेप घेता येणार आहे.