शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर भटकत राहिले भावी पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:33 IST

चंद्रपुरात गुरुवारपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी राज्यभरात असंख्य युवक बुधवारीच चंद्रपुरात दाखल झाले. मात्र त्यांच्या निवासाची व जेवणाची कुठेही सोय नसल्याने या युवकांना बुधवारची रात्र भटकून वा मिळेल तो आसरा शोधन काढावी लागली.

ठळक मुद्देना जेवण, ना निवारा : भरती प्रक्रियेसाठी विविध जिल्ह्यातील युवक चंद्रपुरात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात गुरुवारपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी राज्यभरात असंख्य युवक बुधवारीच चंद्रपुरात दाखल झाले. मात्र त्यांच्या निवासाची व जेवणाची कुठेही सोय नसल्याने या युवकांना बुधवारची रात्र भटकून वा मिळेल तो आसरा शोधन काढावी लागली. विशेष म्हणजे, पोलीस विभागाने पोलिसांच्या जीमखाना परिसरात या युवकांची राहण्याची सोय केली होती. मात्र तशी सूचना युवकांना मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.चंद्रपुरात ९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून ११ हजार ९१ बेरोजगार युवक आपले नशिब आजमावत आहेत. यात दोन हजार ४९८ युवती तर आठ हजार ५९३ युवकांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने राज्यभरातील उमेदवार बुधवारी सायंकाळीच चंद्रपुरात दाखल झाले. यातील बहुतांश जणांनी आपल्यासोबत जेवनाचा डब्बा व इतर खाद्य पदार्थ आणले होते. यातील काही जणांनी पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या वि.दा. सावरकर स्मारकाजवळ आपले डब्बे खावून रात्र घालविली. मात्र अनेकांना तिथे जागा नसल्याने जागेचा शोध घेत रात्री शहरात भटकंती करावी लागली.पोलीस मुख्यालयासमोरच बसस्थानक असल्याने अनेक युवकांनी बसस्थानकात रात्र काढली. तर काही जणांनी रेल्वे स्थानकाचा आसरा घेतला. त्यानंतर पहाटेच्या सुमारासही या युवकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. कशाचीच सोय नसल्याने व सार्वजनिक शौचालये माहित नसल्याने पहाटेही या युवकांना शहरात भटकावे लागले. एवढे सर्व करून हे हजारो युवक पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेसाठी पहाटे ५ वाजता उपस्थित झाले. मात्र तिथेही त्यांना गैरसोयीचाच सामना करावा लागला.यवतमाळमधून आलेल्या एका युवकाने सांगितले की त्याला व त्याच्या सहकाºयांना आकाशाखाली मोकळ्या जागेवर रात्र काढावी लागली. डास व थंडीमुळे रात्रभर झोप लागली नाही. अनेक आवश्यक सुविधांसाठी पैसे खर्च करावे लागले.५९० उमेदवार पात्रगुरुवारी पहाटेपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यातील ५९० उमेदवार या चाचणीत पात्र ठरले आहे, अशी माहिती पोलीस विभागाने दिली. या चाचणीवर ज्या उमेदवारांना आक्षेप घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १० मार्चच्या आधी उमेदवारांना या चाचणी प्रक्रियेवर आक्षेप घेता येणार आहे.