विद्यार्थी पटसंख्येत घट : मुलभूत सुविधा पुरविण्याकडे नगर परिषदेचे दुर्लक्षवरोरा : नगरपालिकेल्या मराठी शाळेच्या घटणाऱ्या प्रवेशाला शासनच जबाबदार असल्याने मागेल त्याला शाळा या धोरणामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी स्थानिक नगरपरिषदेच्या सदस्यांना प्रभागनिहाय जबाबदारी द्यावी, अशी मागणी शिक्षणप्रेमीकडून केली जात आहे.‘मागेल त्याला शाळा’ असे धोरण अवलंबल्याने वरोरासह परिसरात अशा शाळेचे पेव फुटले आहे. या धोरणामुळे शहरात १५ शाळेच्या जवळपास इंग्रजी शाळांचे जाळे पसरले असल्याने मराठी शाळांमध्ये पालकांचा कानाडोळा होत आहे. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे.खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमुळे विद्यार्थी व पालकांचे अशा शाळांकडे वाढणारे आकर्षण, यामुळे मराठी शाळा ओस पडत आहे.वरोरा शहरात नगरपालिकेमार्फत सात मराठी शाळा सुरू आहे. मात्र प्रशासनाने केलेले दुर्लक्ष भविष्यात मध्यमवर्गीयांना न पेलणारे आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता त्या गावातील मराठी शाळेत १० टक्केसुद्धा विद्यार्थी नसल्याने शिक्षक संभ्रमावस्थेत आहे. अशा शाळा वाचविण्यासाठी स्थानिक नगर परिषद सदस्यांना प्रभागनिहाय जबाबदारी देऊन शाळेचा पट वाढविणे गरजेचे आहे.मराठी शाळेतील वर्ग इमारत, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, क्रीडांगण, दर्जेदार शिक्षण, शालेय परिसर यांच्याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या शाळा मोडकळीस आल्या आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी या प्राथमिक दर्जाच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सोईसुविधांच्या सुधारणेमुळेच शाळांची पटसंख्या वाढेल अन्यथा या शाळा ओस पडल्यास शासनच जबाबदार असेल. नगरपालिका तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी पुढाकार घेऊन भविष्यात विद्यार्थ्याशिवाय बंद पडणाऱ्या शाळा वाचविणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
मराठी शाळांचे भवितव्य धोक्यात
By admin | Updated: March 26, 2016 00:47 IST