शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

वनक्षेत्रातील कृषी पंपांना यापुढे 12 तास अखंडित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 22:37 IST

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधात तत्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया  जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन होत असल्याने शेतकरी  रात्री कामांसाठी शेतात जातात. अशावेळी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत नागरिकांचे बळी जात असल्याने शेतकरी रात्री  शेतात जाण्यास धास्तावला. ही समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यात दिवसा होणारे कृषी पंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते सायंकाळी  ६ वाजेपर्यंत कृषी पंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधात तत्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया  जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन होत असल्याने शेतकरी  रात्री कामांसाठी शेतात जातात. अशावेळी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मंत्री मुनगंटीवार यांना भेटून विनंती केली होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर  व गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना दिवसा कृषी पंपांना वीजपुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी तत्काळ मान्यही केली. याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उत्पादनाचे नुकसान टळणारकृषिपंपांना वीजपुरवठा मुबलक नसल्याने विहिरीतील पाणी शेतीला देता येत नाही. या समस्येने शेतकरी हैराण झाले आहेत, पण त्यावर उपाययोजना झाली नव्हती. जिल्ह्यातील शेतीला ऊर्जास्रोत कमी पडत आहे. ऊर्जेअभावी शेतीस पाणी न मिळाल्याने पिकांना पाण्याचा ताण बसतो आणि त्याचा फटका उत्पादनाला बसतो. अशा एक ना अनेक समस्यांनी शेती ग्रासली आहे.

 वनक्षेत्रात सर्वाधिक अडचणीवनक्षेत्रातील शेतकरी आता पारंपरिक भातशेतीसोबत विविध प्रकारची नगदी पिके घेण्यास उत्सुक झाले; परंतु कृषिपंप असूनही विजेअभावी त्यांचा निरुपयोग झाला. नगदी पिकांचा अभाव आणि पारंपरिक शेतीमुळे अल्प उत्पादन या दुष्टचक्रात जिल्ह्यातील शेती अडकली आहे. विजेच्या सतत टंचाईने शेतीची कामे अर्धवट ठेवावी लागतात.

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती