शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या दिव्यात होतात मृतांवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 15, 2015 01:08 IST

शहरालगत तीन स्मशानभूमी आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून या स्मशानभूमी मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत.

वरोरा : शहरालगत तीन स्मशानभूमी आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून या स्मशानभूमी मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहेत. पालिका प्रशासनाने या सुविधाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रात्री मृतांच्या पार्थिवावर वाहनाचे दिवे लावून अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.वरोरा शहरालगत वणी रोड, बोर्डा पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व मालवीय वार्डात, अशा तीन स्मशानभूमी आहेत. यामध्ये पालिका प्रशासनाच्या वतीने दोन स्मशानभूमीची देखभाल केली जाते. या स्मशानभूमीमध्ये मृतदेह जाळण्यासाठी असलेले लोखंडी स्टँड केव्हाच बेपत्ता झाले आहेत. सहा महिन्यांपासून हातपंप बंद आहेत तर विद्युत दिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. अशा दयनीय अवस्था वणी नाक्याकडील स्मशानभूमीची झाली आहे. नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या स्मशानभूमीची देखभाल केली जाते. परंतु मागील सहा महिन्यांपासून या स्मशानभूमीत मुलभुत सोयी कोलमडल्या आहेत. तरीही प्रशासनाने लक्ष देऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रात्री अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास मृताच्या आप्तेष्टांना जनरेटरची व्यवस्था, गॅसबत्ती, इमरजन्सी दिवे घेऊन जावे लागते. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना मृताच्या आप्तेष्टांना अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य त्यासोबतच इतरही साहित्य घेऊन जावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.स्मशानभूमीतील हातपंप मागील काही महिन्यांपासून बंद आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर स्मशानभूमीमध्ये मृतावर अंत्यसंस्कार करणाऱ्या अंगावर पाणी घ्यावे लागते. स्मशानभूमीत पाणी नसल्याने पाणी असलेल्या कॅन घेऊन मृताच्या आप्तेष्टांना स्मशानभूमीत जावे लागत आहे. अशा अनेक कठीण प्रसंगांशी दोन हात करूनच मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)