शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

इरई खोलीकरणाला निधीचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:26 IST

अनेकांची ओरड, सामाजिक संघटनांनी केलेली आंदोलने आणि लोकमतचा पाठपुरावा, यामुळे शासनाने वेकोलि आणि वीज केंद्राच्या सहकार्याने इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू केले.

ठळक मुद्देशासन पुन्हा उदासीन : अडीच वर्षांपासून सुरू आहे काम

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांची ओरड, सामाजिक संघटनांनी केलेली आंदोलने आणि लोकमतचा पाठपुरावा, यामुळे शासनाने वेकोलि आणि वीज केंद्राच्या सहकार्याने इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू केले. त्यामुळे उद्योगांमुळे घाणीने बरबटलेल्या इरईने मोकळा श्वास घेणे सुरू केले. अशातच आता निधीअभावी हे काम पुन्हा अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आले आहे.इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक विकास झाला. एमईएल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आले. या उद्योगांतील दूषित पाणी इरई नदीतच सोडले जाऊ लागले. पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या पात्राला लागूनच वेकोलिचे मातीचे महाकाय ढिगारे आहेत. या ढिगाºयामुळे इरई नदीचे पात्रच बदलले. याशिवाय पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला.कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. मात्र आता निधीअभावी हे काम अर्धवट अवस्थेतच थांबविण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांची चिंता वाढली आहे.दोन टप्प्यात कामइरई नदीच्या खोलीकरणाचे काम दोन टप्प्यात करणे प्रस्तावित होते. यातील पहिला टप्पा पडोली ते चवराळापर्यंत आणि दुसरा टप्पा चवराळा ते हडस्तीपर्यंत, असा आहे. यानुसार अजून चवराळा ते हडस्तीपर्यंतच्या नदीच्या पात्राचे खोलीकरण होणे शिल्लक आहे.निधी देण्यास शासनाकडून दिरंगाईइरई नदीच्या खोलीकरणाचे काम वेकोलि आणि चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या सहकार्याने होत आहे. वेकोलि आणि वीज केंद्राने आपला निधी सिंचन विभागाकडे सुपुर्दही केला. मात्र शासनच निधी देण्यास दिरंगाई करीत असल्याची माहिती आहे.इरई खोलीकरणाचे काम सध्या बंद आहे. हे काम दोन टप्प्यात होत आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. चवराळा ते हडस्तीपर्यंतच्या दुसºया टप्प्याला मंजुरी मिळून निधी आल्यानंतर कामाला सुरूवात करण्यात येईल.- राजेश सोनोणे, कार्यकारी अभियंता,सिंचन विभाग, चंद्रपूर.