शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बल्लारपूर शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणेन

By admin | Updated: October 12, 2014 23:43 IST

गेली २० वर्षे बल्लारपूर मतदार संघाच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले आहे. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर विकासाची विविध कामे या मतदार संघात पूर्णत्वास आणली.

चंद्रपूर : गेली २० वर्षे बल्लारपूर मतदार संघाच्या विकासासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले आहे. बल्लारपूर तालुक्याच्या निर्मीतीनंतर विकासाची विविध कामे या मतदार संघात पूर्णत्वास आणली. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतानाही बल्लारपूर शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालय, चार कोटी रु. किंमतीचे नाट्यगृह अशी अनेक विकासकामे मंजूूर करविली. विधानसभेत यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षाचे टप्पे वेळोवेळी जनतेला सादर केले. राज्यात जरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तरीही लोकप्रतिनिधी म्हणून आपण केलेल्या संघर्षातूनच ही विकासकामे मंजूर झाली. सत्ता राहून होत नाही तर विधायक कामांसाठी शासनाशी संघर्ष करून पाठपुरावा करावा लागतो, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.राज्यात भाजपा-मित्रपक्ष युतीचे सरकार स्थापन झाल्यास केंद्र सरकारच्या सहाय्याने बल्लारपूर शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा विशेष निधी खेचून आणू अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. बल्लारपूर शहरातील कॉलरी गेस्टहाऊस नजिकच्या ग्राऊंडमध्ये आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री खा. हेमा मालिनी या सभेला प्रकृती कारणामुळे येऊ शकल्या नाही. या सभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यात समस्यांचा डोंगर उभा करण्याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काहीही केलेले नाही. लोकसभेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना जनतेने त्यांची योग्य जागा दाखविली. विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा जनता त्यांना त्यांची योग्य जागा दाखवेन व भारतीय जनता पार्टीला पुर्ण बहुमत देत जनताच भाजपाला सत्तारूढ करेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.यावेळी सभेच्या मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, निलेश खरबडे, समीर केने, अजय दुबे, रेणुका दुधे, शिवचंद द्विवेदी, धर्मप्रकाश दुबे, मनीष पांडे, अ‍ॅड. रणंजय सिंह, मिना चौधरी, वैशाली जोशी, पुष्पा डंगोरे, कांता ढोके, सुशिला गांडलेवार, मिना चौधरी, वर्षा सुंचुवार, येलय्या दासरप आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना हरीश शर्मा यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टिका केली. सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर करविलेल्या विकासकामांचे श्रेय घ्यायला काँग्रेस नेहमी तयार असते. राज्यात जरी यांचे सरकार होते तरीही मुनगंटीवारांनी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून ही विकासकामे मंजूर करविली. वेळोवेळी विधानसभेच्या माध्यमातून याबाबत केलेला पाठपुरावा व प्रयत्न यांची माहिती आजही जनतेला देण्यास तयार आहोत, असेही हरीश शर्मा यावेळी बोलताना म्हणाले. निलेश खरबडे, अजय दुबे यांचीही भाषणे झाली.