शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:10 IST

संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा कारागृह परिसरातील शहीद बाबुराव शेडमाके स्मारकाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे. बिरसा मुंडा यांची जयंती देशभर साजरी होत असताना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाची सुरुवात करत असल्याचा मोठा आनंद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, आमदार राजू तोडसाम, महापौर अंजली घोटेकर, भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज सुखराम मुंडा, शहीद बाबुराव शेडमाके यांचे वंशज गोविंदराव शेडमाके, रामचंद्र शेडमाके, गुणाबाई शेडमाके, खुशाल बोंडे, विजय राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, अभियंता मनोज जयस्वाल, दयालाल कन्नाके, विजय राऊत आदी उपस्थित होते.चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरात १८५७ च्या उठावामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाºया वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीनिमित्त स्मारक बांधण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली होती. त्याची पूर्तता करण्यासाठी बिरसा मुंडा यांच्या स्मृती अभिवादनाच्या शासनाच्या मोहिमेमध्ये बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज सहभागी झाल्याचा आनंदही ना. अहीर यांनी व्यक्त केला. वीर बाबुराव शेडमाके यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. त्याठिकाणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिवादन केले. २५ लाख रूपये खर्च करून स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तथापि ही सुरुवात असून जेल प्रशासनाच्या अधिपत्यात असणारी या ठिकाणची गोंड राज्याच्या राजवाड्याची वास्तू मोकळी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन यावेळी ना. अहीर यांनी केले. या देशाचा खरा इतिहास हा आदिवासींचा इतिहास आहे. मात्र त्यांचा संघर्ष लिहण्यात आला नाही. बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज तुमच्यापुढे आहेत. या कुटुंबाच्या बलिदानामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे शहिदांचा सर्वात आधी सन्मान करणे या शासनाचे आद्य कर्तव्य आहे. स्मारकासाठी खासदार निधीतून रक्कम खर्च करण्यात आला. पण ही सुरुवात आहे. आदिवासी बांधवांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यादृष्टीने आमची पाऊले पडत असून आदिवासींना सोडून आमची वाटचाल शक्य नाही. याची आम्हाला जाणीव असल्याचे त्यांनी ना. अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार तोडसाम म्हणाले, आदिवासी बांधवानी आपली संस्कृती विसरु नये, भाषा, सण उत्सव या माध्यमातून संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आमदार शामकुळे यांनी या स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दिली. महापौर घोटेकर यांनी वीर बाबूराव शेडमाके यांच्या क्रांतीकारी आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी केले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर