शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:10 IST

संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा कारागृह परिसरातील शहीद बाबुराव शेडमाके स्मारकाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे. बिरसा मुंडा यांची जयंती देशभर साजरी होत असताना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाची सुरुवात करत असल्याचा मोठा आनंद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, आमदार राजू तोडसाम, महापौर अंजली घोटेकर, भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज सुखराम मुंडा, शहीद बाबुराव शेडमाके यांचे वंशज गोविंदराव शेडमाके, रामचंद्र शेडमाके, गुणाबाई शेडमाके, खुशाल बोंडे, विजय राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, अभियंता मनोज जयस्वाल, दयालाल कन्नाके, विजय राऊत आदी उपस्थित होते.चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरात १८५७ च्या उठावामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाºया वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीनिमित्त स्मारक बांधण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली होती. त्याची पूर्तता करण्यासाठी बिरसा मुंडा यांच्या स्मृती अभिवादनाच्या शासनाच्या मोहिमेमध्ये बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज सहभागी झाल्याचा आनंदही ना. अहीर यांनी व्यक्त केला. वीर बाबुराव शेडमाके यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. त्याठिकाणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिवादन केले. २५ लाख रूपये खर्च करून स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तथापि ही सुरुवात असून जेल प्रशासनाच्या अधिपत्यात असणारी या ठिकाणची गोंड राज्याच्या राजवाड्याची वास्तू मोकळी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन यावेळी ना. अहीर यांनी केले. या देशाचा खरा इतिहास हा आदिवासींचा इतिहास आहे. मात्र त्यांचा संघर्ष लिहण्यात आला नाही. बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज तुमच्यापुढे आहेत. या कुटुंबाच्या बलिदानामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे शहिदांचा सर्वात आधी सन्मान करणे या शासनाचे आद्य कर्तव्य आहे. स्मारकासाठी खासदार निधीतून रक्कम खर्च करण्यात आला. पण ही सुरुवात आहे. आदिवासी बांधवांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यादृष्टीने आमची पाऊले पडत असून आदिवासींना सोडून आमची वाटचाल शक्य नाही. याची आम्हाला जाणीव असल्याचे त्यांनी ना. अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार तोडसाम म्हणाले, आदिवासी बांधवानी आपली संस्कृती विसरु नये, भाषा, सण उत्सव या माध्यमातून संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आमदार शामकुळे यांनी या स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दिली. महापौर घोटेकर यांनी वीर बाबूराव शेडमाके यांच्या क्रांतीकारी आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी केले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर