शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान मौलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:10 IST

संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हा कारागृह परिसरातील शहीद बाबुराव शेडमाके स्मारकाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संस्कृतीचे प्रामाणिकपणे जतन व संवर्धन करणाऱ्या आदिवासींनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेला लढा बावनकशी होता. मात्र हा इतिहास लिहिला गेला नाही. यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प शासनाने उचलला आहे. बिरसा मुंडा यांची जयंती देशभर साजरी होत असताना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाची सुरुवात करत असल्याचा मोठा आनंद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. नाना श्यामकुळे, आमदार राजू तोडसाम, महापौर अंजली घोटेकर, भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज सुखराम मुंडा, शहीद बाबुराव शेडमाके यांचे वंशज गोविंदराव शेडमाके, रामचंद्र शेडमाके, गुणाबाई शेडमाके, खुशाल बोंडे, विजय राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, अभियंता मनोज जयस्वाल, दयालाल कन्नाके, विजय राऊत आदी उपस्थित होते.चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरात १८५७ च्या उठावामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाºया वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीनिमित्त स्मारक बांधण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली होती. त्याची पूर्तता करण्यासाठी बिरसा मुंडा यांच्या स्मृती अभिवादनाच्या शासनाच्या मोहिमेमध्ये बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज सहभागी झाल्याचा आनंदही ना. अहीर यांनी व्यक्त केला. वीर बाबुराव शेडमाके यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. त्याठिकाणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिवादन केले. २५ लाख रूपये खर्च करून स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तथापि ही सुरुवात असून जेल प्रशासनाच्या अधिपत्यात असणारी या ठिकाणची गोंड राज्याच्या राजवाड्याची वास्तू मोकळी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन यावेळी ना. अहीर यांनी केले. या देशाचा खरा इतिहास हा आदिवासींचा इतिहास आहे. मात्र त्यांचा संघर्ष लिहण्यात आला नाही. बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज तुमच्यापुढे आहेत. या कुटुंबाच्या बलिदानामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे शहिदांचा सर्वात आधी सन्मान करणे या शासनाचे आद्य कर्तव्य आहे. स्मारकासाठी खासदार निधीतून रक्कम खर्च करण्यात आला. पण ही सुरुवात आहे. आदिवासी बांधवांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यादृष्टीने आमची पाऊले पडत असून आदिवासींना सोडून आमची वाटचाल शक्य नाही. याची आम्हाला जाणीव असल्याचे त्यांनी ना. अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार तोडसाम म्हणाले, आदिवासी बांधवानी आपली संस्कृती विसरु नये, भाषा, सण उत्सव या माध्यमातून संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आमदार शामकुळे यांनी या स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दिली. महापौर घोटेकर यांनी वीर बाबूराव शेडमाके यांच्या क्रांतीकारी आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी केले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर