शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

उत्पादनासाठी खर्च करुनही पदरी निराशाच

By admin | Updated: March 14, 2015 01:09 IST

वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती ...

कोरपना: वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती सिंचनासाठी अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. सोबतच विजेच्या भारनियमनामुळे उभी पिके वाळतात. परिणामी,उत्पादनासाठी खर्च करुनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत असल्याची विदारक स्थिती आहे. अनेकदा पिकांच्या उत्पादनावर होणारा खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांबाबतच्या सरकारच्या उदासिन धोरणामुळे बळीराजाने शेती करायची कशी, असा प्रश्न पडला आहे.मुळात शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असून उदरनिर्वाहाचा खर्च वाढत चालल्याने महागाईची झळ शेतकऱ्यांना सोसणे कठीण झाले आहे. मागील जमाखर्चाचा हिशेब तो मांडू शकत नाही, आणि मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून निष्पन्नही काहीच होत नाही. पेरणीच्यावेळी खत विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने खतांची विक्री होते. बियाण्यांचे दरही वाढत असल्याने जमाखर्चाचा त्याला मेळ घालता येणे अवघड झाले आहे. शिवाय किटकनाशके, तणनाशकांच्या किंमतीही गगणाला भिडल्या असल्याने शेतकऱ्यांना खते, तणनाशकांची फवारणी करणे परवडत नाही. त्यामुळे पुढील हंगामासाठी पैशाची तजवित कशी करायची? असा प्रश्न आवासून त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.सध्या शासन दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवीन पेव फुटले असून शेतकऱ्यांच्या जीवनपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शेतीतील घटत्या उत्पादनामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे निव्वळ शेतकऱ्यांचीच शेतात मजूरीच होत असल्याचे भयाणक चित्र पहावयास मिळत आहे. कृषी विभागाच्या योजनांचा मोठा गाजावाजा होत असताना गरजू शेतकऱ्यांना खरेच या योजनांचा लाभ मिळतो का, असलेल्या योजना त्यांना मिळत नसतील तर त्या योजना काय कामाच्या, शेतीच्या नावावर शासन दरबारी मोठी रक्कम खर्च होत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे उत्पादन कमी का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील शेतकऱ्यांना अद्यापही शेतीचे कोडे सुटत नाही. उत्पादनाला भाव कमी मिळत असल्याने शेती करायची कशी, या विवंचनेत बळीराजा अडकला आहे. (तालुका प्रतिनिधी)