शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
4
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
5
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
6
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
7
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
8
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
9
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
10
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
11
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
12
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
14
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
15
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
16
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
17
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
18
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
19
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
20
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

उत्पादनासाठी खर्च करुनही पदरी निराशाच

By admin | Updated: March 14, 2015 01:09 IST

वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती ...

कोरपना: वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती सिंचनासाठी अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. सोबतच विजेच्या भारनियमनामुळे उभी पिके वाळतात. परिणामी,उत्पादनासाठी खर्च करुनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत असल्याची विदारक स्थिती आहे. अनेकदा पिकांच्या उत्पादनावर होणारा खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांबाबतच्या सरकारच्या उदासिन धोरणामुळे बळीराजाने शेती करायची कशी, असा प्रश्न पडला आहे.मुळात शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असून उदरनिर्वाहाचा खर्च वाढत चालल्याने महागाईची झळ शेतकऱ्यांना सोसणे कठीण झाले आहे. मागील जमाखर्चाचा हिशेब तो मांडू शकत नाही, आणि मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून निष्पन्नही काहीच होत नाही. पेरणीच्यावेळी खत विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने खतांची विक्री होते. बियाण्यांचे दरही वाढत असल्याने जमाखर्चाचा त्याला मेळ घालता येणे अवघड झाले आहे. शिवाय किटकनाशके, तणनाशकांच्या किंमतीही गगणाला भिडल्या असल्याने शेतकऱ्यांना खते, तणनाशकांची फवारणी करणे परवडत नाही. त्यामुळे पुढील हंगामासाठी पैशाची तजवित कशी करायची? असा प्रश्न आवासून त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.सध्या शासन दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवीन पेव फुटले असून शेतकऱ्यांच्या जीवनपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शेतीतील घटत्या उत्पादनामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे निव्वळ शेतकऱ्यांचीच शेतात मजूरीच होत असल्याचे भयाणक चित्र पहावयास मिळत आहे. कृषी विभागाच्या योजनांचा मोठा गाजावाजा होत असताना गरजू शेतकऱ्यांना खरेच या योजनांचा लाभ मिळतो का, असलेल्या योजना त्यांना मिळत नसतील तर त्या योजना काय कामाच्या, शेतीच्या नावावर शासन दरबारी मोठी रक्कम खर्च होत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे उत्पादन कमी का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील शेतकऱ्यांना अद्यापही शेतीचे कोडे सुटत नाही. उत्पादनाला भाव कमी मिळत असल्याने शेती करायची कशी, या विवंचनेत बळीराजा अडकला आहे. (तालुका प्रतिनिधी)