शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

उत्पादनासाठी खर्च करुनही पदरी निराशाच

By admin | Updated: March 14, 2015 01:09 IST

वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती ...

कोरपना: वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. कोरपना तालुक्यात दोन जलाशये असताना तेथील पाण्याचा शेती सिंचनासाठी अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. सोबतच विजेच्या भारनियमनामुळे उभी पिके वाळतात. परिणामी,उत्पादनासाठी खर्च करुनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत असल्याची विदारक स्थिती आहे. अनेकदा पिकांच्या उत्पादनावर होणारा खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांबाबतच्या सरकारच्या उदासिन धोरणामुळे बळीराजाने शेती करायची कशी, असा प्रश्न पडला आहे.मुळात शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असून उदरनिर्वाहाचा खर्च वाढत चालल्याने महागाईची झळ शेतकऱ्यांना सोसणे कठीण झाले आहे. मागील जमाखर्चाचा हिशेब तो मांडू शकत नाही, आणि मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून निष्पन्नही काहीच होत नाही. पेरणीच्यावेळी खत विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने खतांची विक्री होते. बियाण्यांचे दरही वाढत असल्याने जमाखर्चाचा त्याला मेळ घालता येणे अवघड झाले आहे. शिवाय किटकनाशके, तणनाशकांच्या किंमतीही गगणाला भिडल्या असल्याने शेतकऱ्यांना खते, तणनाशकांची फवारणी करणे परवडत नाही. त्यामुळे पुढील हंगामासाठी पैशाची तजवित कशी करायची? असा प्रश्न आवासून त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.सध्या शासन दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवीन पेव फुटले असून शेतकऱ्यांच्या जीवनपद्धतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शेतीतील घटत्या उत्पादनामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे निव्वळ शेतकऱ्यांचीच शेतात मजूरीच होत असल्याचे भयाणक चित्र पहावयास मिळत आहे. कृषी विभागाच्या योजनांचा मोठा गाजावाजा होत असताना गरजू शेतकऱ्यांना खरेच या योजनांचा लाभ मिळतो का, असलेल्या योजना त्यांना मिळत नसतील तर त्या योजना काय कामाच्या, शेतीच्या नावावर शासन दरबारी मोठी रक्कम खर्च होत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे उत्पादन कमी का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील शेतकऱ्यांना अद्यापही शेतीचे कोडे सुटत नाही. उत्पादनाला भाव कमी मिळत असल्याने शेती करायची कशी, या विवंचनेत बळीराजा अडकला आहे. (तालुका प्रतिनिधी)