शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग : मागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.आदिवासी महिलांनी रेला नृत्य सादर करूं आझाद बगीचामधून मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चात, जिवती, राजूरा, कोरपणा, चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा, सिंदेवाही, सावली, नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील हजारो आदिवासी सहभागी झाले होते. जिवती, राजुरा, कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोलाम, गोंड आदिवासी आहेत. त्यामुळे या आदिवासींच्या विकासासाठी जिवती येथे आदिवासी विकास विभागाचे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय मंजूर करावे अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.राजुरा तालुक्यातील बेरडी गावाचे पुर्नवसन करावे, आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडून ताबे काढून द्यावे, डोणी गाव चंद्रपूर तालुक्यातून वगळून मूल तालुक्यात जोडावे, डोणी येथील आदिवासींना रोजगार देण्याचे दृष्टीने ताडोबा अभयारण्यांसाठी डोणी गेट सुरू करावे, आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह प्रवेश क्षमता वाढवावी, मूल येथील कोरकूंना घरे द्यावी, कॉम्पा, सोनझरी येथील आदिवासींना जातीचे दाखले द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.मोर्चाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विजय सिध्दावार, प्रा. जया कापसे, शामराव कोटनाके, महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, विमल कोडापे, यात्रिका कुमरे, अमरे, सपना कामडी यांनी मार्गदर्शन केले.मोर्चात सतत संघर्ष करणारे नामदेव उदे, येल्लापूर येथील संघर्ष करून आपली जमिन ताब्यात ठेवणारी भीमबाई सिडाम, सावली तालुक्यातील आदिवासी महिला कार्यकर्त्या यात्रिका कुमरे, श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकाºयांना याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी श्रमिक एल्गारचे संघटन सचिव डॉ. कल्याणकुमार, अनिल मडावी, रवी नैताम, सपना कामडी, दिनेश घाटे, शहनाज बेग, फरजाना शेख, किरण बावणे, संगीता गेडाम, बिंदू गडलींग, शालू धुर्वे बाळू मडावी, अमर कडयाम, मोनी कुळमेथे, राणी भोयर यांनी परिश्रम घेतले. या मोर्चामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.