शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग : मागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.आदिवासी महिलांनी रेला नृत्य सादर करूं आझाद बगीचामधून मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चात, जिवती, राजूरा, कोरपणा, चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा, सिंदेवाही, सावली, नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील हजारो आदिवासी सहभागी झाले होते. जिवती, राजुरा, कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोलाम, गोंड आदिवासी आहेत. त्यामुळे या आदिवासींच्या विकासासाठी जिवती येथे आदिवासी विकास विभागाचे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय मंजूर करावे अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.राजुरा तालुक्यातील बेरडी गावाचे पुर्नवसन करावे, आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडून ताबे काढून द्यावे, डोणी गाव चंद्रपूर तालुक्यातून वगळून मूल तालुक्यात जोडावे, डोणी येथील आदिवासींना रोजगार देण्याचे दृष्टीने ताडोबा अभयारण्यांसाठी डोणी गेट सुरू करावे, आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह प्रवेश क्षमता वाढवावी, मूल येथील कोरकूंना घरे द्यावी, कॉम्पा, सोनझरी येथील आदिवासींना जातीचे दाखले द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.मोर्चाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विजय सिध्दावार, प्रा. जया कापसे, शामराव कोटनाके, महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, विमल कोडापे, यात्रिका कुमरे, अमरे, सपना कामडी यांनी मार्गदर्शन केले.मोर्चात सतत संघर्ष करणारे नामदेव उदे, येल्लापूर येथील संघर्ष करून आपली जमिन ताब्यात ठेवणारी भीमबाई सिडाम, सावली तालुक्यातील आदिवासी महिला कार्यकर्त्या यात्रिका कुमरे, श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकाºयांना याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी श्रमिक एल्गारचे संघटन सचिव डॉ. कल्याणकुमार, अनिल मडावी, रवी नैताम, सपना कामडी, दिनेश घाटे, शहनाज बेग, फरजाना शेख, किरण बावणे, संगीता गेडाम, बिंदू गडलींग, शालू धुर्वे बाळू मडावी, अमर कडयाम, मोनी कुळमेथे, राणी भोयर यांनी परिश्रम घेतले. या मोर्चामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.