शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

जवखेडे हत्याकांडाच्या विरोधात मोर्चा

By admin | Updated: November 11, 2014 22:38 IST

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

चंद्रपूर : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरूवात चंद्रपूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. हा मोर्चा रिपब्लिकन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चात चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन संघर्ष समितीचे खुशाल तेलंग, प्रा.एस.टी.चिकटे, अंकूश वाघमारे, प्रविण खोब्रागडे, गोपाळराव देवगडे, अ‍ॅड.सत्यजित उराडे, सिद्धार्थ वाघमारे, शंकरराव सागोरे, रमेशचंद्र राऊत, कैविशा मेश्राम, अश्विनी खोब्रागडे, राजेश वनकर, कुशल मेश्राम, जी.के.उपरे, भारत थुलकर, सुरेश नारनवरे यांनी केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच कठोर शब्दात निषेध केला. जाधव कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आजपर्यंतची सर्वच सरकारे दलितांवर होणारा अत्याचार रोखण्यात अपयशी ठरल्याचे सांगत वक्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. सभेनंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन सादर केले. जाधव कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अहमदनगर चे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांना बडतर्फ करण्यात यावे, नगर जिल्हा दलित अत्याचार जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, आदि मागण्या शिष्टमंडळाने निवेदनातून केल्या आहेत. (प्रतिनिधी)