शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना लागले डोहाळे; राजकीय चर्चांना आले उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 13:57 IST

चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एप्रिल महिन्यात मनपाचा कार्यकाळ संपत असून, नवीन प्रभागरचनेचा आराखडा मंजुरीसाठी प्रशासनाने पाठविला आहे.

ठळक मुद्देचौकाचौकात झळकताहेत बॅनर्स

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यामध्ये संपत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांसह अपक्ष आणि इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सभा, बैठका, विकासकामांचे उद्घाटन, नागरिकांच्या समस्यांवर विचारमंथनही केले जात आहे. दुसरीकडे काही इच्छुक नव्या उमेदवारांना नगरसेवक होण्याचे डोहाळे लागले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी नगरसेवक म्हणून शहरातील विविध भागात बॅनर्स लावत राजकीय हवा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. एप्रिल महिन्यात मनपाचा कार्यकाळ संपत असून, नवीन प्रभागरचनेचा आराखडा मंजुरीसाठी प्रशासनाने पाठविला आहे. जुन्या प्रभागानुसार शहरात १७ प्रभाग आणि ६६ नगरसेवक आहेत. नवीन प्रभागानुसार एका प्रभागात तीन नगरसेवक राहणार असून, २६ प्रभाग तसेच ७७ नगरसेवक राहण्याची शक्यता आहे.

अगदी काही दिवसांत मनपाचा कार्यकाळ संपणार असल्याने भाजपसह इतर राजकीय पक्षांनी शहरात सभा, बैठका, विकासकामांचे उद्घाटन करणे सुरु करून वातावरण निर्मिती सुरु केली आहे. निवडणूक लढण्याची इच्छा असणाऱ्या काहींनी राजकीय नेत्यांची भेट घेणेही सुरु केले आहे. काहींनी भावी नगरसेवक म्हणून शहरातील विविध भागात बॅनर्स लावले असून, वातावरण निर्मिती सुरु केली आहे. जिथे जमेल त्या पक्षाकडून निवडणूक लढवायची, कुठेच नाही जमले नाही तर शेवटी अपक्ष म्हणून उभे राहण्याचीही तयारी सुरु केली आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत नागरिक कोणाला पसंती देणार, हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.

मनपातील पक्षीय बलाबल

भाजप- ३६

काँग्रेस- १२

बीएसपी-०८

राष्ट्रवादी ०२

शिवसेना-०२

मनसे -०२

अपक्ष -४

सध्याचे प्रभाग -१७ नगरसेवक ६६

नवे प्रभाग -२६ नगरसेवक ७७

चार नगरसेवकांचा एक प्रभाग

महापालिकेच्या १७ प्रभागांमध्ये सद्यस्थितीत ६६ नगरसेवक आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार यामध्ये वाढ होणार असून, २६ प्रभागात ७७ नगरसेवक असतील, असे बोलले जात आहे.

मोर्चेबांधणी सुरु

महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून राजकीय पक्षांसह काही अपक्षांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काही राजकीय पक्षांनी बैठकाही घेतल्या असून, वार्डातील संभावित उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही दिवसांपूर्वीच बैठक पार पडली. मागील निवडणुकीतील उमेदवारांना मिळालेल्या मतांनुसार त्या - त्या पक्षांना जागा वाटप करण्याचेही यावेळी ठरविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण