शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या जागा शरीर स्वास्थ्याचे केंद्र व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:10 IST

प्रदूषणाच्या समस्येशी आम्ही लढत असताना शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणाच्या घशात न जाता या ठिकाणी पर्यावरणपूरक बाबींना वाव मिळायला हवा. शहरातील मोकळ्या जागा विचारमंथन व शरीर स्वास्थ्याचे केंद्र झाल्या पाहिजे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातील पाच मोकळ्या जागांचा होणार विकास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रदूषणाच्या समस्येशी आम्ही लढत असताना शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणाच्या घशात न जाता या ठिकाणी पर्यावरणपूरक बाबींना वाव मिळायला हवा. शहरातील मोकळ्या जागा विचारमंथन व शरीर स्वास्थ्याचे केंद्र झाल्या पाहिजे. शरीराला व मनाला आयाम देणाºया पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करण्याची इच्छा होती. ती पूर्णत्वास जात असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचेपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर शहरातील आनंदनगर सोसायटीमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान, भावना सोसायटीमध्ये महात्मा बसवेश्वर उद्यान, शंकरनगर सोसायटीमध्ये स्व. प्रमोद महाजन उद्यान, इंजिनिअर्स कॉलनीमध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान, लक्ष्मीनगर सोसायटीमध्ये राजमाता राणी हिराई उद्यानाचे लोकार्पण बुधवारी सायंकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभागृह नेता वसंत देशमुख, झोन सभापती देवानंद वाढई आदी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, एकाच दिवशी पाच मोकळया जागेच्या ठिकाणी देखण्या उद्यानाचे लोकार्पण करताना आनंद झाल्याचे सांगितले. महानगरपालिका हद्दीमधील मोकळया जागा हे अतिक्रमणाचे केंद्र बनतात. यातून या जागा पुढे घाणीचे साम्राज्य वाढवतात. चंद्रपूर शहरात अशा पध्दतीचे मोकळया जागांना बकाल स्वरुप येऊ नये, यासाठी वैशिष्टयपूर्ण योजना निधीतून शहरातील या मोकळया जागांना महापुरुषांच्या नावाने उद्यान उभारण्याचे कार्य आपण सुरु केले असून वेगवेगळया ठिकाणी चांगल्या स्वरुपात ही उद्यानं लोकांसाठी मोकळी झाल्याचा आनंद आहे. परिसरात राहणाºया दक्ष नागरिकांनी विशेषत: जेष्ठ नागरिक संघांनी या विकसित जागेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वयंप्रेरणेने घ्यावी. महानगरपालिका आपले दायित्व पूर्ण करेलच. परंतु अशा सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाची व सुरक्षेची जबाबदारी घेणाºया लोकांमध्ये वाढ झाली पाहिजे. ही सुरक्षित स्थळे विचार मंथनाची आणि शरीराला स्वस्थता देणारी केंद्र झाली पाहिजे. शहरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार