शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

राज्यातील चार लाख दहा हजार ६८४ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:41 IST

शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे.

ठळक मुद्देहमी भाव मात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कप्रवीण खिरटकरचंद्रपूर : शासनाने नाफेडमार्फत हमी भावाने चना व तूर खरेदी करणे बंद केले. त्यामुळे राज्यातील चार लाख १० हजार ६८४ शेतकरी नाफेडकडे तूर व चना विक्रीची नोंद करुन प्रतीक्षेत आहे. यामध्ये या शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे.महाराष्ट्रात शासनाने नाफेडमार्फत हमी भावाने तूर व चना खरेदी सुरु केली होती. याकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करणे बंधनकारक होते. नोंदणी झाल्यानंतर क्रमाक्रमाने शेतकऱ्यांना बोलाविले जात होते. त्यामध्ये राज्यात नाफेडने दोन लाख ६५ हजार ८५४ शेतकऱ्यांची तूर तर ९९ हजार १६१ शेतकऱ्यांच्या चना हमी भावाने खरेदी केला. चना व तूर तीन लाख ६५ हजार १५ क्विंटल खरेदी केली. तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने तूर ठेवणारी गोदामे तुडूंब भरली. भाडे तत्वावरील गोदामेही हाऊसफूल झाल्याने तूर व चना ठेवण्याकरिता जागा नाही व पावसाचा हंगाम सुरु झाल्याने शासनाने चना व तूर खरेदीला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी चिंतेत सापडले होते. शासनाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत बाजार समितीने अधिकृत केलेल्या व्यापाऱ्यास चना व तूर विकण्यास मोकळीक दिली असून व्यापाऱ्यास चना व तूर विकल्या नंतर व्यापाऱ्याकडील नोंदणी केलेली पावती आदी दस्तऐवज बाजार समितीकडे जमा केल्यानंतर शासन प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.हमी भाव मात्र नाहीशेतकऱ्यांना अनुदान दहा क्विंटल प्रती हेक्टर असून ही मर्यादा जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मुदतीत एसएमएस पाठवता आला नाही, असे शेतकरी अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी हमी भाव मात्र शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तूर व चना विक्रीची नोंदणी करुनही हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कायम राहत असल्याने मानले जात.एसएमएसने केला घातचना व तूर विक्रीकरिता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तारीख निश्चित करुन एसएमएस पाठविण्यात आले. अनेक शेतकऱ्यांना एसएमएस समजले नाही. त्यामुळे शेतकरी नोंदणी करुनही अनभिज्ञ राहिले. अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा एसएमएसने घात केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी