शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

राज्यातील चार लाख दहा हजार ६८४ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:41 IST

शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे.

ठळक मुद्देहमी भाव मात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कप्रवीण खिरटकरचंद्रपूर : शासनाने नाफेडमार्फत हमी भावाने चना व तूर खरेदी करणे बंद केले. त्यामुळे राज्यातील चार लाख १० हजार ६८४ शेतकरी नाफेडकडे तूर व चना विक्रीची नोंद करुन प्रतीक्षेत आहे. यामध्ये या शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे.महाराष्ट्रात शासनाने नाफेडमार्फत हमी भावाने तूर व चना खरेदी सुरु केली होती. याकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करणे बंधनकारक होते. नोंदणी झाल्यानंतर क्रमाक्रमाने शेतकऱ्यांना बोलाविले जात होते. त्यामध्ये राज्यात नाफेडने दोन लाख ६५ हजार ८५४ शेतकऱ्यांची तूर तर ९९ हजार १६१ शेतकऱ्यांच्या चना हमी भावाने खरेदी केला. चना व तूर तीन लाख ६५ हजार १५ क्विंटल खरेदी केली. तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने तूर ठेवणारी गोदामे तुडूंब भरली. भाडे तत्वावरील गोदामेही हाऊसफूल झाल्याने तूर व चना ठेवण्याकरिता जागा नाही व पावसाचा हंगाम सुरु झाल्याने शासनाने चना व तूर खरेदीला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी चिंतेत सापडले होते. शासनाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत बाजार समितीने अधिकृत केलेल्या व्यापाऱ्यास चना व तूर विकण्यास मोकळीक दिली असून व्यापाऱ्यास चना व तूर विकल्या नंतर व्यापाऱ्याकडील नोंदणी केलेली पावती आदी दस्तऐवज बाजार समितीकडे जमा केल्यानंतर शासन प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.हमी भाव मात्र नाहीशेतकऱ्यांना अनुदान दहा क्विंटल प्रती हेक्टर असून ही मर्यादा जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मुदतीत एसएमएस पाठवता आला नाही, असे शेतकरी अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी हमी भाव मात्र शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तूर व चना विक्रीची नोंदणी करुनही हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कायम राहत असल्याने मानले जात.एसएमएसने केला घातचना व तूर विक्रीकरिता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तारीख निश्चित करुन एसएमएस पाठविण्यात आले. अनेक शेतकऱ्यांना एसएमएस समजले नाही. त्यामुळे शेतकरी नोंदणी करुनही अनभिज्ञ राहिले. अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा एसएमएसने घात केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी