शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

राज्यातील चार लाख दहा हजार ६८४ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:41 IST

शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे.

ठळक मुद्देहमी भाव मात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कप्रवीण खिरटकरचंद्रपूर : शासनाने नाफेडमार्फत हमी भावाने चना व तूर खरेदी करणे बंद केले. त्यामुळे राज्यातील चार लाख १० हजार ६८४ शेतकरी नाफेडकडे तूर व चना विक्रीची नोंद करुन प्रतीक्षेत आहे. यामध्ये या शेतकऱ्यांनी बाजार समिती नोंदणीकृत व्यापाऱ्यास बाजार भावाने चना व तूर विक्री केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिले जणार आहे.महाराष्ट्रात शासनाने नाफेडमार्फत हमी भावाने तूर व चना खरेदी सुरु केली होती. याकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करणे बंधनकारक होते. नोंदणी झाल्यानंतर क्रमाक्रमाने शेतकऱ्यांना बोलाविले जात होते. त्यामध्ये राज्यात नाफेडने दोन लाख ६५ हजार ८५४ शेतकऱ्यांची तूर तर ९९ हजार १६१ शेतकऱ्यांच्या चना हमी भावाने खरेदी केला. चना व तूर तीन लाख ६५ हजार १५ क्विंटल खरेदी केली. तुरीची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याने तूर ठेवणारी गोदामे तुडूंब भरली. भाडे तत्वावरील गोदामेही हाऊसफूल झाल्याने तूर व चना ठेवण्याकरिता जागा नाही व पावसाचा हंगाम सुरु झाल्याने शासनाने चना व तूर खरेदीला मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी चिंतेत सापडले होते. शासनाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत बाजार समितीने अधिकृत केलेल्या व्यापाऱ्यास चना व तूर विकण्यास मोकळीक दिली असून व्यापाऱ्यास चना व तूर विकल्या नंतर व्यापाऱ्याकडील नोंदणी केलेली पावती आदी दस्तऐवज बाजार समितीकडे जमा केल्यानंतर शासन प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.हमी भाव मात्र नाहीशेतकऱ्यांना अनुदान दहा क्विंटल प्रती हेक्टर असून ही मर्यादा जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मुदतीत एसएमएस पाठवता आला नाही, असे शेतकरी अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी हमी भाव मात्र शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तूर व चना विक्रीची नोंदणी करुनही हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट कायम राहत असल्याने मानले जात.एसएमएसने केला घातचना व तूर विक्रीकरिता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तारीख निश्चित करुन एसएमएस पाठविण्यात आले. अनेक शेतकऱ्यांना एसएमएस समजले नाही. त्यामुळे शेतकरी नोंदणी करुनही अनभिज्ञ राहिले. अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा एसएमएसने घात केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी