शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी चार किलोमीटर पायपीट

By admin | Updated: May 3, 2017 00:44 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक नसली तरी काही दुर्गम गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे.

पोलीस आले मदतीला : लोलडोह व पाटागुड्याचा टंचाई आराखड्यात समावेश नाही

मिलिंद कीर्ती चंद्रपूरजिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक नसली तरी काही दुर्गम गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अशा गावांचा टंचाई आराखड्यामध्ये केला समावेश नसल्याचे पुढे आले आहे. स्थानिक लोकांनी ओरड केल्यावर गटविकास अधिकाऱ्याने पाटागुडा व लोलडोह या गावांचा विशेष प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर केला. त्यातील पाटागुडामध्ये पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस विभागाने तत्परता दाखवून बोअरवेल खोदून दिली आहे.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ४१३ गावांसाठी प्रस्तावित टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामध्ये जिवती तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमधील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भयावह आहे. या गावांमधील पाण्याचे स्रोत आटले आहेत. आसपास कोठेही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे गावापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचत नाही. या परिस्थितीमध्ये महिलांना पहाटेची झोप मोड करून तीन ते चार किलोमीटर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. पाणी मिळाल्यानंतर ते घागरींमध्ये भरून डोक्यावर पायी चालत आणावे लागत आहे. ही दररोजची स्थिती असली तरी त्याकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे फारसे लक्ष नाही. त्यामुळेच टंचाई आरखडा तयार करताना अनेक गावांचा समावेश करण्यात आलेला नाही.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या टंचाई आराखड्यात जिवती तालुक्यातील पाटागुडाचा (मांगगुडा) समावेश नव्हता. जिवती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी २० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेकडे पाटागुडाचा विशेष प्रस्ताव पाठविल्यानंतर टंचाई उपायोजना हाती घेण्यात आली आहे. तेथे भीषण पाणीटंचाई आहे. ही बाब पेट्रोलिंग करताना पोलीस पथकाला आढळून आली. पाटागुडाप्रमाणे लोलडोहचाही टंचाई आराखड्यात समावेश नव्हता. त्यामुळे पाणीटंचाई नियंत्रणात आणण्याकरिता जिवतीच्या गटविकास अधिकाऱ्याने २९ एप्रिल रोजी लोलडोहचा प्रस्ताव पाठविला. या दोन्ही गावांसाठी खासगी विहिरी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पाटागुडाला मिळाली बोअरवेलनक्षलग्रस्त भाग असल्याने पोलिसांनी २६ एप्रिल रोजी जिवती तालुक्यात पेट्रोलिंग केली. त्यावेळी पाटणपासून १५ किलोमीटर अंतरावरील पाटागुहा येथे रणरणत्या उन्हात महिला डोक्यावर पाणी भरलेल्या घागरी आणत असल्याचे आढळून आले. हे गाव भाईपठारपासून दीड किलोमीटर आत जंगलामध्ये असून तेथे केवळ २० घरांची लोकवस्ती आहे. तेथे पोलिसांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. या अभियानातील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र मडावी यांनी गावातील पाणी समस्या जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांच्यापुढे मांडली. दिवान यांनी लगेच तेथे बोअरवेल करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर व पीएसआय मडावी यांनी दोन दिवसांत गावात बोअरवेल खोदून दिली.