शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाण्यासाठी चार किलोमीटर पायपीट

By admin | Updated: May 3, 2017 00:44 IST

जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक नसली तरी काही दुर्गम गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे.

पोलीस आले मदतीला : लोलडोह व पाटागुड्याचा टंचाई आराखड्यात समावेश नाही

मिलिंद कीर्ती चंद्रपूरजिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता अधिक नसली तरी काही दुर्गम गावांमध्ये अद्यापही ग्रामस्थांना तीन ते चार किलोमीटर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अशा गावांचा टंचाई आराखड्यामध्ये केला समावेश नसल्याचे पुढे आले आहे. स्थानिक लोकांनी ओरड केल्यावर गटविकास अधिकाऱ्याने पाटागुडा व लोलडोह या गावांचा विशेष प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर केला. त्यातील पाटागुडामध्ये पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पोलीस विभागाने तत्परता दाखवून बोअरवेल खोदून दिली आहे.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ४१३ गावांसाठी प्रस्तावित टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामध्ये जिवती तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमधील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भयावह आहे. या गावांमधील पाण्याचे स्रोत आटले आहेत. आसपास कोठेही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे गावापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचत नाही. या परिस्थितीमध्ये महिलांना पहाटेची झोप मोड करून तीन ते चार किलोमीटर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. पाणी मिळाल्यानंतर ते घागरींमध्ये भरून डोक्यावर पायी चालत आणावे लागत आहे. ही दररोजची स्थिती असली तरी त्याकडे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे फारसे लक्ष नाही. त्यामुळेच टंचाई आरखडा तयार करताना अनेक गावांचा समावेश करण्यात आलेला नाही.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या टंचाई आराखड्यात जिवती तालुक्यातील पाटागुडाचा (मांगगुडा) समावेश नव्हता. जिवती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी २० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेकडे पाटागुडाचा विशेष प्रस्ताव पाठविल्यानंतर टंचाई उपायोजना हाती घेण्यात आली आहे. तेथे भीषण पाणीटंचाई आहे. ही बाब पेट्रोलिंग करताना पोलीस पथकाला आढळून आली. पाटागुडाप्रमाणे लोलडोहचाही टंचाई आराखड्यात समावेश नव्हता. त्यामुळे पाणीटंचाई नियंत्रणात आणण्याकरिता जिवतीच्या गटविकास अधिकाऱ्याने २९ एप्रिल रोजी लोलडोहचा प्रस्ताव पाठविला. या दोन्ही गावांसाठी खासगी विहिरी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पाटागुडाला मिळाली बोअरवेलनक्षलग्रस्त भाग असल्याने पोलिसांनी २६ एप्रिल रोजी जिवती तालुक्यात पेट्रोलिंग केली. त्यावेळी पाटणपासून १५ किलोमीटर अंतरावरील पाटागुहा येथे रणरणत्या उन्हात महिला डोक्यावर पाणी भरलेल्या घागरी आणत असल्याचे आढळून आले. हे गाव भाईपठारपासून दीड किलोमीटर आत जंगलामध्ये असून तेथे केवळ २० घरांची लोकवस्ती आहे. तेथे पोलिसांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. या अभियानातील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र मडावी यांनी गावातील पाणी समस्या जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांच्यापुढे मांडली. दिवान यांनी लगेच तेथे बोअरवेल करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर व पीएसआय मडावी यांनी दोन दिवसांत गावात बोअरवेल खोदून दिली.