शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

चार धरणे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:01 IST

गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देसंततधार पाऊस : जिल्ह्यात आतापर्यंत ४७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अंमलनाला, पकडीगुड्डम, चंदई, लभानसराड ही चार धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर चारगाव, आसोलामेंढा, घोडाझरी, डोंगरगाव व इरई धरणात बऱ्यापैकी पाणी साठा जमा झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी जिल्ह्यात केवळ ५० ते ५५ टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात अनेक गाव व शहरांवर पाणी संकट ओढावले होते. यातच चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई धरणाने तळ गाठल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. अनेक गावात व शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे जिल्हावासीयांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली होती.जून महिन्यात पावसाने हजेरी लावून नंतर हुलकावणी दिली. मात्र जुलै महिन्यात पावसाची चांगलीच बॅटींग सुरू असून अनेक भागातील जजजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे.काही ठिकाणी छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर आला असून शेतपिकाचे नुकसान झाले आहे. पकडीगुड्डम, चंदई, अंमलनाला, लभानसराड या धरणाच्या वेस्टवेअरमधून पाणी ओसंडून वाहत आहे. तर इतरही प्रकल्प ५० टक्के वर भरले आहेत.कोरपना तालुक्यात सर्वाधिक ८१८.२६ मिमी पाऊसगेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १ जून ते १० जुलैपर्यंत सरासरी ४७७ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. मागिल वर्षी १० जुलै पर्यंत सरासरी १५७.५८ मिमी पाऊस पडला होता. १० जुलैपर्यंत चंद्रपूर तालुक्यात ४१८ मिमी, बल्लारपूर ४३७ मिमी, गोंडपिपरी ४५५.६ मिमी, पोंभूर्णा ३८७.७ मिमी, मूल ५६४.६ मिमी, सावली ३९५.८ मिमी, वरोरा, ५५६.२४ मिमी, भद्रावती ५४२.३ मिमी, चिमूर ४८१ मिमी, ब्रम्हपूरी ३७३.६ मिमी, सिंदेवाही ४३०.८ मिमी, नागभीड ३२८.३ मिमी, राजुरा ४०४.५२ मिमी, कोरपना ८१८.२६ मिमी तर जिवती तालुक्यात ५६१.९ मिमी असे एकुण ४७७ मिमी पाऊस झाला असून सरासरी ४६.६ एवढी आहे.इरई धरणात २४.४८ टक्के जलसाठाचंद्रपूरकरांची तहाण भागविणाऱ्या इरई धरणातूनच वीज निर्मिती केंद्राला पाणी दिले जाते. परंतु, पाणीसाठा नसल्याने १५ जुलैपासून सीटीपीएसचा पाणी पुरवठा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. तसे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बुधवारपर्यंत इरई धरणात २४.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व वीज निर्मिती केंद्रावरील पाणी संकट काहीसे दूर झाले असून शहराला आता नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.