शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

चार धरणे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:01 IST

गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देसंततधार पाऊस : जिल्ह्यात आतापर्यंत ४७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अंमलनाला, पकडीगुड्डम, चंदई, लभानसराड ही चार धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर चारगाव, आसोलामेंढा, घोडाझरी, डोंगरगाव व इरई धरणात बऱ्यापैकी पाणी साठा जमा झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी जिल्ह्यात केवळ ५० ते ५५ टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात अनेक गाव व शहरांवर पाणी संकट ओढावले होते. यातच चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई धरणाने तळ गाठल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. अनेक गावात व शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे जिल्हावासीयांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली होती.जून महिन्यात पावसाने हजेरी लावून नंतर हुलकावणी दिली. मात्र जुलै महिन्यात पावसाची चांगलीच बॅटींग सुरू असून अनेक भागातील जजजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे.काही ठिकाणी छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर आला असून शेतपिकाचे नुकसान झाले आहे. पकडीगुड्डम, चंदई, अंमलनाला, लभानसराड या धरणाच्या वेस्टवेअरमधून पाणी ओसंडून वाहत आहे. तर इतरही प्रकल्प ५० टक्के वर भरले आहेत.कोरपना तालुक्यात सर्वाधिक ८१८.२६ मिमी पाऊसगेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १ जून ते १० जुलैपर्यंत सरासरी ४७७ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. मागिल वर्षी १० जुलै पर्यंत सरासरी १५७.५८ मिमी पाऊस पडला होता. १० जुलैपर्यंत चंद्रपूर तालुक्यात ४१८ मिमी, बल्लारपूर ४३७ मिमी, गोंडपिपरी ४५५.६ मिमी, पोंभूर्णा ३८७.७ मिमी, मूल ५६४.६ मिमी, सावली ३९५.८ मिमी, वरोरा, ५५६.२४ मिमी, भद्रावती ५४२.३ मिमी, चिमूर ४८१ मिमी, ब्रम्हपूरी ३७३.६ मिमी, सिंदेवाही ४३०.८ मिमी, नागभीड ३२८.३ मिमी, राजुरा ४०४.५२ मिमी, कोरपना ८१८.२६ मिमी तर जिवती तालुक्यात ५६१.९ मिमी असे एकुण ४७७ मिमी पाऊस झाला असून सरासरी ४६.६ एवढी आहे.इरई धरणात २४.४८ टक्के जलसाठाचंद्रपूरकरांची तहाण भागविणाऱ्या इरई धरणातूनच वीज निर्मिती केंद्राला पाणी दिले जाते. परंतु, पाणीसाठा नसल्याने १५ जुलैपासून सीटीपीएसचा पाणी पुरवठा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. तसे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बुधवारपर्यंत इरई धरणात २४.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व वीज निर्मिती केंद्रावरील पाणी संकट काहीसे दूर झाले असून शहराला आता नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.