शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

चार धरणे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:01 IST

गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देसंततधार पाऊस : जिल्ह्यात आतापर्यंत ४७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अंमलनाला, पकडीगुड्डम, चंदई, लभानसराड ही चार धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर चारगाव, आसोलामेंढा, घोडाझरी, डोंगरगाव व इरई धरणात बऱ्यापैकी पाणी साठा जमा झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी जिल्ह्यात केवळ ५० ते ५५ टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात अनेक गाव व शहरांवर पाणी संकट ओढावले होते. यातच चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई धरणाने तळ गाठल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. अनेक गावात व शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे जिल्हावासीयांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली होती.जून महिन्यात पावसाने हजेरी लावून नंतर हुलकावणी दिली. मात्र जुलै महिन्यात पावसाची चांगलीच बॅटींग सुरू असून अनेक भागातील जजजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे.काही ठिकाणी छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर आला असून शेतपिकाचे नुकसान झाले आहे. पकडीगुड्डम, चंदई, अंमलनाला, लभानसराड या धरणाच्या वेस्टवेअरमधून पाणी ओसंडून वाहत आहे. तर इतरही प्रकल्प ५० टक्के वर भरले आहेत.कोरपना तालुक्यात सर्वाधिक ८१८.२६ मिमी पाऊसगेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १ जून ते १० जुलैपर्यंत सरासरी ४७७ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. मागिल वर्षी १० जुलै पर्यंत सरासरी १५७.५८ मिमी पाऊस पडला होता. १० जुलैपर्यंत चंद्रपूर तालुक्यात ४१८ मिमी, बल्लारपूर ४३७ मिमी, गोंडपिपरी ४५५.६ मिमी, पोंभूर्णा ३८७.७ मिमी, मूल ५६४.६ मिमी, सावली ३९५.८ मिमी, वरोरा, ५५६.२४ मिमी, भद्रावती ५४२.३ मिमी, चिमूर ४८१ मिमी, ब्रम्हपूरी ३७३.६ मिमी, सिंदेवाही ४३०.८ मिमी, नागभीड ३२८.३ मिमी, राजुरा ४०४.५२ मिमी, कोरपना ८१८.२६ मिमी तर जिवती तालुक्यात ५६१.९ मिमी असे एकुण ४७७ मिमी पाऊस झाला असून सरासरी ४६.६ एवढी आहे.इरई धरणात २४.४८ टक्के जलसाठाचंद्रपूरकरांची तहाण भागविणाऱ्या इरई धरणातूनच वीज निर्मिती केंद्राला पाणी दिले जाते. परंतु, पाणीसाठा नसल्याने १५ जुलैपासून सीटीपीएसचा पाणी पुरवठा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. तसे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बुधवारपर्यंत इरई धरणात २४.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व वीज निर्मिती केंद्रावरील पाणी संकट काहीसे दूर झाले असून शहराला आता नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.