शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

आरक्षणानंतर प्रस्थापितांची नव्याने मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

वास्तविक या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या असत्या. या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती.  वार्ड निश्चितीपासून तर वार्डातील आरक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. गावपातळीवरील पुढाºयांनीही निवडणुकीची तयारी चालविली होती. मात्र ऐनवेळी कोरोनाने डोके वर काढल्याने निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आणि अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले.

ठळक मुद्दे१५ जानेवारीला मतदान : ६२९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नुकतेच प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामपंचायातींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायती आहेत.  या निवडणुका १५ जानेवारी २०२१ रोजी होत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरक्षणानंतर अनेक प्रस्थापितांना फटका बसला होता. आता निवडणूक जाहीर झाल्याने तेदेखील नव्याने मोर्चेबांधणी करू लागले आहेत. वास्तविक या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या असत्या. या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. वार्ड निश्चितीपासून तर वार्डातील आरक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. गावपातळीवरील पुढाºयांनीही निवडणुकीची तयारी चालविली होती. मात्र ऐनवेळी कोरोनाने डोके वर काढल्याने निवडणूक कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आणि अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले. दरम्यान, ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपल्याने या ग्रामपंचायतींवर शासनाकडून प्रशासक नियुक्त करण्यात आले होते.  प्रशासकामुळे विकास खुंटल्याचा आरोप होत होता.

संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन होईल दाखलया सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे, नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे.  नामनिर्देशन पत्र २३ ते ३० डिसेंबर २०२० (२५, २६ व २७ डिसेंबरची सार्वजनिक सुटी वगळून) या कालावधीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

राजकीय हालचालींना वेगआता निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावपातळीवरील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यापूर्वीच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात आली होती.पण आता सरपंचांची निवड सदस्यांमधून होणार असल्याने आणि २३ डिसेंबर २०२० पासूनच नामांकन दाखल करण्यास सुरूवात होणार असल्याने येत्या दोन चार दिवसांत गावपातळीवरील राजकीय हालचाली चांगल्याच गती घेतील, असे संकेत आहे. 

असा असणार निवडणूक कार्यक्रमनिवडणूक कार्यक्रमानुसार १५ डिसेंबर २०२० रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. २३ डिसेंबर २०२० पासून ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामांकन सादर करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी नामांकनाची छाणनी होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी नामांकन परत घेता येईल. त्याचबरोबर उमेदवारवारांना चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी आणि मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे.

आचारसंहिता लागूजिल्ह्यात १५ जानेवारी २०२१ रोजी ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष व उमेदवारांवर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. शिवाय या ग्रामपंचायतींमध्ये ११ डिसेंबर २०२० पासून आचारसंहिता अंमलात आणण्यात आलेली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक