शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

ब्रह्मपुरीच्या देलनवाडी प्रभागाला तलावाचे रूप

By admin | Updated: June 24, 2015 01:28 IST

येथील प्रभाग क्रं. ४ देलनवाडी भागात पहिल्याच पावसाने अनेक सखल भागात पाणी साचल्याने तलावाचे रूप आले आहे.

पालिकेचे दुर्लक्ष : पाणी साचून राहत असल्याने आजार वाढण्याची शक्यताब्रह्मपुरी : येथील प्रभाग क्रं. ४ देलनवाडी भागात पहिल्याच पावसाने अनेक सखल भागात पाणी साचल्याने तलावाचे रूप आले आहे. पाणी बाहेर वाहून जात नसल्याने दुर्गंधी निर्माण होऊन आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पाण्यातून मोठ्यांपासून तर लहान मुलांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.देलनवाडी भागातील शेषनगर, आनंदनगर, विद्युत कॉलनी, श्रीनगर, शांतीनगर, प्रबुद्धनगर, शिक्षक कॉलनी, गजानन नगर, आदी भागात नवीन वसाहत निर्माण झाली आहे. यातील काही भागात अनेक नागरिक १५ ते २० वर्षापासून वास्तव्यास आहेत. परंतु, अजुनही भौतिक सुविधा पालिकेने पुरविलेल्या नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पहिला पावसातच वॉर्डवासीयांवर आपत्ती ओढावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक भागात पाणी साचून असून पाणी बाहेर काढण्यासाठी नाली नसल्याने पाणी जैसे थे आहे. जागोजागी पाणी साचले असल्याने या भागाला तलावाचे स्वरूप आले असून यापूर्वी नागरिकांनी सह्यानिशी निवेदने दिले. मात्र त्यावर कुठलाही निर्णय पालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला नाही. या भागातून जास्तीत जास्त कराचा भरणा करूनही सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. प्रभागाच्या नगरसेविका डॉ. हेमलता नंदूरकर यांच्या माध्यमातून काही कामे करण्यात आल्याने या भागाची थोडी व्यवस्था सुधारली आहे. परंतू अनेक भागात मात्र समस्यांचा डोंगर उभा असून याकडे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)