शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:42 IST

भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले.

ठळक मुद्देकपाशीला बोंडअळीचा विळखा : भरपाईसाठी करता येणार दावा

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले. जिल्ह्यातील कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत असतानाच बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केल्यावर नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाने शेतकºयांकडून आता प्रपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना या तालुक्यात यंदा कापसाचे लागवड क्षेत्र वाढले. धान उत्पादक म्हणून ओळखणाऱ्या ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. जादा उत्पन्न मिळेल, या आशेने बीटी-२ या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. मात्र, हे बियाणे यंदाच्या बदलत्या वातावरणात तग धरू शकले नाही. याचा जोरदार फटका कपाशीच्या उगवण क्षमतेवर झाला. शिवाय झाडाला बोंडे लागल्यानंतर गुलाबी बोंड अळीने विळखा घातला. त्यामुळे कपाशीचे बोंड काळपट झाले. यातून हेक्टरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राजुरा, कोरपना तालुक्यातील त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीच्या प्रार्दुभाव झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढतच असल्याचे सध्या दिसून येत आहे. या तक्रारीची दखल घेवून कृषी विभागाच्या तपासणी पथकाने शेतशिवाराची पाहणी सुरू केली. दरम्यान, बोंड अळीच्या तक्रारीची संख्या अधिक असल्याने आता प्रपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.असे आहे प्रपत्रनमुना-जी नियम १२ (१) नुसार शेतकºयांकडून हे प्रपत्र भरून घेण्यात येणार आहे. बियाणे कुठून खरेदी केले, प्लॉट क्रमांक, किती एकरांत लागवड केली, उगवण क्षमता कशी होती, याची नोंदणी या प्रपत्रातून घेण्यात येणार आहे. या प्रपत्राला ‘चार-ए प्रपत्र’ असे नाव देण्यात आले आहे.प्रपत्रातून होणार नुकसानीचे मुल्यांकनगुलाबी बोंड अळीच्या नुकसानीसंदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच पिकाचे मुल्यमापन करण्यासाठी या प्रपत्राद्वारे नुकसानीचा दावा करता येणार आहे. बीटी कंपनीने भरपाईसाठी नकार दिल्यास संबंधित शेतकºयाला न्यायालयात दाद मागता येणार आहे.सीसीआयचा आदेश धाब्यावरबीटी-२ तंत्रज्ञानाद्वारे निर्माण केलेल्या कपाशी बियाणे संदर्भात केंद्रीय कापूस संस्थेने (सीसीआय) डिसेंबर २०१५ ला मार्गदर्शक सूचना जारी केले होते. या सूचनेला अनुसरूनच बीटी बियाणे वापरत असताना खबरदारी घेण्याचे राज्य शासनाने मान्य केले. त्यानुसार एक आदेशही देण्यात आला होता. मात्र, या आदेशाचे पालन न झाल्याने कृषी व्यवसायिक व दलालांच्या मार्फतीने बीटी बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे ही गुलाबी बोंड अळी शेतीच्या जीवावर उठली आहे.