शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

वनाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:00 IST

सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश :अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. शनिवारी चंद्र्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील वनविभागाशी संबंधित समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक एन. प्रवीण, उपवनसंरक्षक गुरू प्रसाद, उपविभागीय वनाधिकारी सोनकुसरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, रामपाल सिंग, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, सरपंच श्रीकांत बावणे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वनउपज गोळा करणे, हिरवा बांबु चिचपल्ली येथील नागरिकांना उपलब्ध करून देणे, याकरिता वनाधिकाºयांनी सकारात्मक कार्यवाही करावी. हा परिसर १०० टक्के आरोग्ययुक्त, एलपीजी गॅसयुक्त तसेच अंगणवाड्या आयएसओयुक्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता गावाला सोलर फेन्सिंग करण्यासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान उपलब्ध करून दिल्या जाते. यात १० टक्के निधी ग्रामपंचायतींनी देणे बंधनकारक आहे. योग्य नियोजन केल्यास ही मागणीदेखील लवकरच पूर्णत्वाला येऊ शकते. गरम पाण्यासाठी लाकडे तोडण्यास जंगलात नागरिकांनी जाऊ नये. अधिकाऱ्यांनी गावातच सोलर वॉटर हिटरची व्यवस्था करून द्यावी. परिसरात रोजगार व स्वयंरोजगारासाठी सर्वेक्षण करून यासंदर्भातील आराखडा तयार करावा, असे निर्देशही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.पुलांच्या बांधकामासाठी केंद्राकडून १०२.७८ कोटीपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केल्याने केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत १०२. ७८ कोटींचा निधी मंजुर केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने ८ मार्च २०१९ रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून सदर पुलांच्या बांधकामांसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी मिळाल्याची माहीती कळविली आहे. यात प्रामुख्याने मूल तालुक्यातील मोरवाही गावाजवळ उमा नदी पुलाच्या बांधकामासाठी २४. ३९ कोटी, डोंगरगाव गावाजवळ उमा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामाला २१. ८३ कोटी तर विसापूर- कोलगाव रस्त्यावर वर्धा नदी पुलासाठी ५६.५६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पुलांच्या बांधकामामुळे मूल व बल्लारपूर तालुक्यातील दळणवळणाचा मोठा प्रश्न कायमचा सुटणार आहे. शिवाय तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे.चिचपल्लीला मिळणार रूग्ण्वाहिकावनालगतच्या सर्व गावांच्या विकासाच्या विकासाकरिता एक ब्ल्यु प्रिंट तयार करण्यात यावी. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच या कार्यवाहीला मूर्त रूप प्राप्त होईल. येत्या १५ दिवसात चिचपल्ली येथे नागरिकांच्या सोयीसाठी रूग्ण्वाहिका उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.