शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वनाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:00 IST

सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश :अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या वनविभागाशी संबंधित समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता वनाधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. शनिवारी चंद्र्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील वनविभागाशी संबंधित समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.यावेळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक एन. प्रवीण, उपवनसंरक्षक गुरू प्रसाद, उपविभागीय वनाधिकारी सोनकुसरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, रामपाल सिंग, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, सरपंच श्रीकांत बावणे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वनउपज गोळा करणे, हिरवा बांबु चिचपल्ली येथील नागरिकांना उपलब्ध करून देणे, याकरिता वनाधिकाºयांनी सकारात्मक कार्यवाही करावी. हा परिसर १०० टक्के आरोग्ययुक्त, एलपीजी गॅसयुक्त तसेच अंगणवाड्या आयएसओयुक्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता गावाला सोलर फेन्सिंग करण्यासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान उपलब्ध करून दिल्या जाते. यात १० टक्के निधी ग्रामपंचायतींनी देणे बंधनकारक आहे. योग्य नियोजन केल्यास ही मागणीदेखील लवकरच पूर्णत्वाला येऊ शकते. गरम पाण्यासाठी लाकडे तोडण्यास जंगलात नागरिकांनी जाऊ नये. अधिकाऱ्यांनी गावातच सोलर वॉटर हिटरची व्यवस्था करून द्यावी. परिसरात रोजगार व स्वयंरोजगारासाठी सर्वेक्षण करून यासंदर्भातील आराखडा तयार करावा, असे निर्देशही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.पुलांच्या बांधकामासाठी केंद्राकडून १०२.७८ कोटीपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केल्याने केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत १०२. ७८ कोटींचा निधी मंजुर केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने ८ मार्च २०१९ रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून सदर पुलांच्या बांधकामांसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरी मिळाल्याची माहीती कळविली आहे. यात प्रामुख्याने मूल तालुक्यातील मोरवाही गावाजवळ उमा नदी पुलाच्या बांधकामासाठी २४. ३९ कोटी, डोंगरगाव गावाजवळ उमा नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामाला २१. ८३ कोटी तर विसापूर- कोलगाव रस्त्यावर वर्धा नदी पुलासाठी ५६.५६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पुलांच्या बांधकामामुळे मूल व बल्लारपूर तालुक्यातील दळणवळणाचा मोठा प्रश्न कायमचा सुटणार आहे. शिवाय तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे.चिचपल्लीला मिळणार रूग्ण्वाहिकावनालगतच्या सर्व गावांच्या विकासाच्या विकासाकरिता एक ब्ल्यु प्रिंट तयार करण्यात यावी. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच या कार्यवाहीला मूर्त रूप प्राप्त होईल. येत्या १५ दिवसात चिचपल्ली येथे नागरिकांच्या सोयीसाठी रूग्ण्वाहिका उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.