शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

वनविभागाचे कार्य उत्तमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:15 IST

निसर्गाने ज्या परिसराला भरभरून दिले आहे, त्याचे सौंदर्य अधिक वाढवत ते स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी नवनवीन संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहे.

ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन क्षेत्राचे लोकार्पण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : निसर्गाने ज्या परिसराला भरभरून दिले आहे, त्याचे सौंदर्य अधिक वाढवत ते स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी नवनवीन संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहे. इको पार्क ही त्यातील एक प्रमुख संकल्पना आहे. पर्यावरण संवर्धन, निसर्ग संवर्धनासाठी ते सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्या विविध लोकहितकारी निर्णयामुळे दुर्लक्षित समजला जाणारा वनविभाग आता मुख्य प्रवाहात आला असून विभागाचे काम उत्तम आहे. लोकांच्या हृदयात विशेष स्थान वनविभागाने निर्माण केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.मूल तालुक्यातील उथळपेठ येथील श्री गायमुख देवस्थान या निसर्ग पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या इको पार्कच्या लोकार्पण सोहळयात चंदनसिंह चंदेल बोलत होते. ते पुढे म्हणाले, चंद्रपुरात बायपास मार्गावर वनविकास महामंडळाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जनतेच्या सेवेत रूजु झाले असून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मूल शहरात पंडीत दीनदयाल उपाध्याय इको पार्क, पोंभुर्णा शहरात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क तयार करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी येथेसुध्दा त्यांच्या पुढाकाराने इको पार्कच्या निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून निसर्ग पर्यटनाला त्यांनी चालना दिली आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून उथळपेठ गायमुख देवस्थान परिसरात तयार करण्यात आलेल्या इको पार्कमुळे या परिसराच्या वैभवात आणखी भर घातली जाणार असल्याचे चंदनसिंह चंदेल म्हणाले.यावेळी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्?थानी होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, जि.प. सदस्य पृथ्वीराज अवताळे, मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, उथळपेठचे सरपंच रवंीद्र सातपुते आदींची उपस्थिती होती.परिसर झाला देखणाउथळपेठ येथील गायमुख देवस्थान पाण्याच्या कुंडाचे सौदर्यीकरण, गाय, बैल आदी प्राण्यांच्या तसेच गुराखी यांच्या प्रतिमा, विविध प्रजातींची लावण्यात आलेली रोपे, मुलांसाठी तयार करण्यात आलेले पार्क आदींच्या माध्यमातून हा परिसर अधिक देखणा करण्यात आलेला आहे.