शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विकास कामांत वनविभागाचे अडथळे ; सिंचनाचा प्रश्न

By admin | Updated: December 14, 2015 01:17 IST

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर, मूल व पोंभूर्णा या तालुक्यांचा तसेच चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम या क्षेत्रातील काही भागाचा समावेश आहे.

वसंत खेडेकर बल्लारपूरबल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर, मूल व पोंभूर्णा या तालुक्यांचा तसेच चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम या क्षेत्रातील काही भागाचा समावेश आहे. या विधानसभेचा भाग औद्योगिक, कृषी आणि वनक्षेत्राने व्यापला असल्याने कृषी आणि वनजमिनीचे प्रमाण बरेच आहे. म्हणून त्या संबंधात समस्याही तेवढ्याच आहेत.सिंचनाबाबत या विधानसभा क्षेत्रातील स्थिती समाधानकारक नाही. या विधानसभेत धान उत्पादक पट्टा अधिक आहे. सिंचनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने कास्तकारांना निसर्गाच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. निसर्गाने साथ दिली तर ठीक अन्यथा धानपिक बुडतो. यंदा हीच स्थिती आहे. जवाहर सिंचन विहिरी, कोल्हापुरी बंधारे आदींच्या माध्यमातून शासन सिंचनाच्या सुविधा निर्माण करीत आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होत असल्याचे दिसत नाही. तलाव आहेत पण त्यात बारमाही पाणी असणारे तलाव किती, हा एक प्रश्नच आहे.बरेचसे तलाव उथळ झाले आहेत. त्यांचे खोलीकरण आवश्यक आहे. तरच पाणी साठवून कास्तकारांच्या, गुरा ढोरांच्या कामी ते येथील. सिंचनाकरिता काही प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. ते पूर्ण झाले तर सिंचनाची व्यवस्था होऊन धानपट्ट्याला बरकत मिळू शकते. मात्र, ते प्रकल्प पूर्ण होण्याकरिता वनविभागाची आडकाठी येत आहे. कोठारी जवळील हतीगोटा वनक्षेत्रातून नाला वाहतो. या नाल्यावर बंधारा बांधल्यास त्याचा फायदा सुमारे अडीचशे हेक्टर शेतीला होवू शकतो. याच परिसरात गोटाडी हा नाला आहे. त्याचाही उपयोग, बंधारा बांधून सुमारे दीडशे हेक्टर शेतीला होईल. पण, वनविभागाची या बंधारा बांधण्याला अडचण येत आहे. कितीतरी वर्षापासून या बंधाऱ्याचा प्रश्न रेंगाळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री आहेत. हत्तीगोटा व गोटाडी बंधाऱ्याचा प्रश्नाची त्यांना जाण आहे. ते वनमंत्री असल्याने वनविभागाचा अडथळा दूर होईल, अशी आता आशा निर्माण झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी सिंचन योजना रखडली आहे. त्याचाही मार्ग मोकळा होणे गरजेचे आहे. सिंचनाचा मोठा प्रकल्प म्हणून गाजावाजा झालेल्या गोसीखुर्द धरणापासून आपणाला पाटाद्वारे पाणी मिळणार व भातशेती संपन्न होणार, अशी आशा मूल क्षेत्रातील शेतकऱ्यांना कितीतरी वर्षापासून लागली आहे. पण, गोसीखुर्द या भागातील कास्तकारांना ‘बिरबल की खिचडी’ सिद्ध होत आहे. वैनगंगा नदीवर हरणघाट सिंचन योजना कार्यरत आहे. पण, त्याचे पाणी राजगड, गवराळा, बोरचांदली, फिस्कुटी, चांदापूर, जुना सुर्ला या सहा गावापर्यंतचे जाते. पुढे इतरही गावातील शेतजमिनीला याचे पाणी मिळावे याकरिता या सिंचन योजनेचा विस्तार करावा, अशी कास्तकारांची मागणी आहे. मूल-भेजगाव या महत्त्वाच्या मार्गावरील उमा नदीवर बांधलेला पूल खचला असून पावसाळ्यात त्यामुळे मार्ग बंद होतो. यामुळे, पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. बल्लारपुरात रविंद्रनगर, मौ.आजाद, राजेंद्र प्रसाद आणि पं. दिनदयाल हे चार वार्ड वनजमिनीवर वसले आहेत. तेथील रहिवाशांना जमिनीचे पट्टे मिळावे जेणेकरून शासकीय योजनांचा या भागाला फायदा होईल. बल्लारपूर शहराच्या विस्ताराकरिता वनजमिनीला आबादी जमीन म्हणून करणे आवश्यक आहे. बामणी-पावर हाऊस बायपास रोड वनविभागाच्या अडथळ्यात अडकला आहे.